राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे.
मुंबई- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. यासाठी तीन आठवडयांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून ५ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवले जाणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
मंगळवारी विधिमंडळात दोन्ही सभागृहांची नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.
पावसाळी अधिवेशनात एकूण १४ विधायके चर्चेला मांडली जाणार आहेत. यामध्ये नवीन दोन विधायकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.