तीन वर्षे सत्तेत राहूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची आश्चर्याचा धक्का देण्याची क्षमता संपलेली नाही. या बाबतीत मोदींना कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असे अब्दुल्ला यांनी ट्विटमधून म्हटले.
श्रीनगर- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धक्कातंत्राचा प्रत्यय आला. याबद्दल जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन भाष्य केले आहे. तीन वर्षे सत्तेत राहूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची आश्चर्याचा धक्का देण्याची क्षमता संपलेली नाही. या बाबतीत मोदींना कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असे अब्दुल्ला यांनी ट्विटमधून म्हटले. मंत्रिमंडळातील फेरबदलांचा अंदाज कोणत्याही पत्रकाराला आला नव्हता, या अर्थाच्या एका ट्विटवर ओमर अब्दुल्लांनी प्रतिक्रिया दिली. यासोबतच अब्दुल्लांनी निर्मला सीतारामन, राज्यवर्धन राठोड, पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आलेल्या नव्या जबाबदा-यांवरही भाष्य केले आहे.
राज्यमंत्र्यापासून (स्वतंत्र प्रभार) ते संरक्षण मंत्रालयापर्यंत. निर्मला सीतारामन खूप चांगले वाटले. तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे. तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. राज्यवर्धन राठोड यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला. राज्यवर्धन राठोड यांना क्रीडा क्षेत्राची चांगली जाण आहे. याशिवाय वयदेखील त्यांच्या बाजूने आहे. क्रीडा मंत्रालयासाठी राठोड यांची निवड अतिशय योग्य आहे, असेदेखील त्यांनी म्हटले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांनी रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेल्या पीयूष गोयल यांचेही अभिनंदन केले. गोयल जम्मू काश्मीरमधील कटराबनिहाल रेल्वे लिंकला प्रोत्साहन देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
[EPSB]
[/EPSB]