Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeवार्षिक राशिभविष्यवार्षिक राशीभविष्य- मिथुन

वार्षिक राशीभविष्य- मिथुन

२० ऑक्टोबर २०१७ ते ०८ नोव्हेंबर २०१८

मिथुन ही राशी चक्रातील तिसरी रास आहे. स्त्री व पुरुषाचे जोडपे हे या राशीचे प्रतीक आहे. ही वायू तत्त्वाची व द्विस्वभाव राशी आहे. बुध या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. त्यामुळे बुद्धिप्रधान अशी ही रास आहे. मिथुन ही विषय राशी असून पुरुष राशी आहे.

आपणाकडे निसर्गत:च उत्तम ग्रहणशक्ती आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. पांडित्य आहे. तीव्र स्मरणशक्ती आहे. ज्ञान साधनेकरिता आपला जन्म असतो. वाचन, चिंतन, मनन, संशोधन, व्यासंग याबद्दल आपली ख्याती असते. आपल्याकडे शोधकपणा असतो. प्रसंगावधान, समयसुचकता, हजरजबाबीपणा, चातुर्य, नर्मविनोद, हसत हसत दुस-यावर टीका करण्याची सवय असते. ही सर्व उत्तम वकिलाला लागणारी गुणवैशिष्टय़े आपणाकडे असतात. अनेक भाषांवर आपले प्रभुत्व असू शकते. शब्दावर आपली हुकूमत असते. वक्तृत्व, चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने, प्रवचने, वृत्तपत्र, बौद्धिक चळवळी ही आपल्या आवडीची खरीखुरी क्षेत्रे होत. आपल्याकडे चिकित्सक वृत्ती आहे. प्रत्येक प्रश्नाचे व समस्येचे विविध पैलू आपल्या नजरेसमोर येतात. ही द्विस्वभाव रास आहे व वायुराशी आहे. यामुळे विचाराने, तडकाफडकी दुसरे टोक गाठण्याचा आपला स्वभाव असतो. आपल्या जीवनात विचारांचा व भावनांचा चढ-उतार होत असतो. या राशीमध्ये चंचलता आहे, अस्थिरता आहे, धरसोडपणा आहे. आपल्या बोलण्यात व कृतीत मेळ असत नाही. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी आपली स्थिती असते. आज एक गोष्ट आवडेल तर थोडय़ाच दिवसात त्या गोष्टीचा कंटाळा येऊन दुसरीच गोष्ट आवडेल असा आपला स्वभाव असतो. आपल्याला मर्दानी व मैदानी खेळापेक्षा कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असेच खेळ आवडतात. एखाद्या गोष्टीचे नेतृत्व स्वीकारण्यापेक्षा पडद्याआड राहून काम करण्याची प्रवृत्ती असते. बँकिंग, पोस्ट, टेलिग्राफ, वकील, बातमीदार, संपादक, विमा एजंट, दलाल, जनसंपर्क व प्रसिद्धी अधिकारी, दुभाषी, स्टेनो टायपिस्ट, कॉम्प्युटर ही आपली क्षेत्रे आहेत. संशोधन कार्य, विज्ञान, शाखा, स्टॅटिस्टिक्स, वाणिज्य, कायदा या विषयात आपला उत्तम प्रभाव पडतो. आपल्या बौद्धिक कौशल्याने मित्रमंडळींतील बैठकीत आपण उठून दिसता. नवनवीन कंपन्या, फर्मस्, संस्था याची आखणी व जुळणी, प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपण उत्तमरीत्या करू शकता.

आपण सतत गतिमान राहता. जगात नवनवीन काय चालले आहे, याचा कुतूहलाने आपण शोध घेत असता. साहित्य, काव्य, नाटय़ या गोष्टी आपणास मुळापासून आवडतात. कुठे काय चालले आहे, याकडे आपले लक्ष असते. यामुळे मिथुन व्यक्ती वृत्तपत्र, आकाशवाणी, टेलिव्हिजन यासारख्या प्रसारमाध्यमांत आघाडीवर असतात. शब्दांचा अचूक वापर हे आपल्या हातातील प्रमुख अस्त्र असते. आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आपणाला असाधारण लोकप्रियता लाभते. आपल्याकडे अनेक गोष्टींचा खजिना असतो. ज्ञानाचे भांडार असते, त्याचा योग्यवेळी आपण कौशल्याने वापर करू शकता. व्यासपीठावर आपण चमकत असता. बुद्धिमत्ता हेच आपले खरेखुरे भांडवल असते. जगातील ज्ञानभांडार समृद्ध करण्यात, विपुल ग्रंथलेखन करण्यात, काव्य – समीक्षा या ज्ञानशाखा संपन्न करण्यात मिथुन व्यक्तींनी मोठाच हातभार लावला आहे.

मिथुन या राशीमध्ये मृग, आद्र्रा व पुनर्वसु ही तीन नक्षत्र येतात. मृग या नक्षत्रातील तिसरे व चौथे चरण, आद्र्रा नक्षत्रातील चारही चरण व पुनर्वसू नक्षत्रातील पहिले तीन चरणांचा समावेश मिथुन राशीमध्ये होतो.

मिथुन रास व मृग नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – धार्मिक यात्रा करणारे, धनाढय़, साहसी, विवेकी, वाहन सुखाचा तसेच भूमी भवनाचा उपभोग घेणारे, हुशार, विद्वान, गतिशील, क्रियाशील, उत्साही, पराक्रमी, भ्रमणशील, उद्योगी.

मिथुन रास व आद्र्रा नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – धार्मिक कार्यात, सामाजिक कार्यात रस घेणारे, चंचल वृत्तीने युक्त, यांचे सर्व योग चंद्रावर अवलंबून असतात. शत्रूनाशक, बलशाली, काहीवेळा आपल्या कृत्याने इतरांना त्रास देणारे.

मिथुन रास व पुनर्वसु नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – व्यवहारकुशल, विद्वान, कोमल, माणुसकी जपणारा, साहित्यप्रेमी, सरळ व सौम्य, ऐश्वर्यसंपन्न जीवन जगणारे, संतोष मानणारा, मातृ-पितृप्रेमी, काव्यप्रेमी.

नक्षत्रानुसार अक्षरज्ञान
मृग नक्षत्र – का, की
आद्र्रा नक्षत्र – कु, घ, गं, छ
पुनर्वसु नक्षत्र – के, को, हा

खालीलप्रमाणे आपणाला आपल्या ग्रहस्थितीप्रमाणे विविध विषयांवर फळे प्राप्त होणार आहेत.

आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. संपूर्ण वर्षभर शनीची प्रथमस्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र, गुरू अनुकूल आहे. दि. ११ ऑक्टोबर २०१८ पर्यंत गुरूची प्रथमस्थानावर दृष्टी असल्यामुळे सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आत्मविश्वास व मनोबल वाढणार आहे. दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरच्या कालखंडामध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे भासेल.

खालील कालखंडात आरोग्याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. काहींना मानसिक अस्वास्थ्य वाटेल. मनावर एक प्रकारचा ताणतणाव राहील. मानसिक उमेद, उत्साह, आशावाद थोडासा कमी होईल. सर्वसामान्यपणे खालील कालखंडात मानसिक कमजोरी राहील.

दि. ०८/०३/२०१८ ते दि. ०२/०५/२०१८ (जबाबदारी वाढेल)

वरील कालखंडात आरोग्य बिघडण्यापेक्षा मानसिकदृष्टय़ा कमकुवतपणा राहील. जबाबदा-या थोडय़ा वाढतील.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. २०/१०/२०१७ ते दि. ०१/११/२०१७
दि. ०६/०१/२०१८ ते दि. २७/०१/२०१८ (जबाबदारी वाढेल)
दि. २०/०२/२०१८ ते दि. १३/०३/२०१८
दि. ०३/०५/२०१८ ते दि. २६/०५/२०१८
दि. १०/०६/२०१८ ते दि. २५/०६/२०१८ (जबाबदारी वाढेल)
दि. ०३/०९/२०१८ ते दि. ३०/०९/२०१८ (जबाबदारी वाढेल)
दि. ०७/१०/२०१८ ते दि. २६/१०/२०१८

खालील कालखंडात आपण आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
दि. ०५/११/२०१७ ते दि. २०/११/२०१७
दि. ११/१२/२०१७ ते दि. ०६/०१/२०१८
दि. १४/०३/२०१८ ते दि. ०२/०५/२०१८
दि. २७/०५/२०१८ ते दि. ०९/०६/२०१८

खालील कालखंडात तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे.
दि. २४/११/२०१७ ते दि. १०/१२/२०१७
दि.२८/०१/२०१८ ते दि. १३/०२/२०१८
दि. २७/१०/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष विशेष समाधानकारक राहणार आहे. हे वर्ष यशदायक व लाभदायक जाणार आहे. विशेषत: दि. ११ ऑक्टोबर २०१७ पर्यंत व्यवसायात उलाढाल करू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. दि. १२ सप्टेंबर २०१८ नंतरच्या कालखंडात कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या उलाढालीकडे लक्ष देऊ शकाल.
या वर्षात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची शाखा सुरू करू शकता. यावर्षी आपणाला व्यवसायात गुरू या ग्रहाचे चांगले पाठबळ लाभणार आहे. व्यवसायात तुमच्या मनासारखी प्रगती होईल. व्यवसायाची प्रगती करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. परंतु व्यवसायाच्या उलाढालीमध्ये काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी.

खालील कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने व अनेकांचे सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने यशदायक ठरतील.
दि. ०३/११/२०१७ ते दि. २६/११/२०१७
दि. १५/१२/२०१८ ते दि. १४/०१/२०१८
दि. ०६/०२/२०१८ ते दि. २६/०३/२०१८
दि. १०/०५/२०१८ ते दि. २६/०५/२०१८
दि. २६/०६/२०१८ ते दि. ३०/०७/२०१८
दि. १९/०९/२०१८ ते दि. ०५/१०/२०१८ (जबाबदारी वाढेल)

खालील कालखंडात आपण व्यवसायातील निर्णय विशेष विचारपूर्वक घ्यावेत.
दि. २८/११/२०१७ ते दि. १०/१२/२०१७
दि. १५/०१/२०१८ ते दि. २६/०१/२०१८
दि. २८/०३/२०१८ ते दि. ०२/०५/२०१८

नोकरी
नोकरीतील मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष चांगले जाणार आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमची नोकरीची जागा चांगली असेल. नोकरीमध्ये वातावरण चांगले असेल. हे संपूर्ण वर्ष बढतीच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. तुमच्या अनुभवाचे, तुमच्या कार्याचे, तुमच्या ज्ञानाचे, तुमच्या बुद्धिमत्तेचे चीज होणार आहे.
या वर्षी आपणाला वरिष्ठांचे व कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. तुमच्या कार्याचा ठसा उमटविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे कष्ट, तुमचे परिश्रम, तुमचा अनुभव हा कारणी लागणार आहे. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरीच्या संदर्भात संधी लाभेल. हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या संदर्भात लाभदायक ठरणार आहे.

खालील कालखंड नोकरीतील व्यक्तींना चांगले जाणार आहेत.
दि. २०/१०/२०१७ ते दि. १४/११/२०१७
दि. १८/०३/२०१८ ते दि. १३/०५/२०१८
दि. १७/०७/२०१८ ते दि. १९/०९/२०१८
दि. १८/१०/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

खालील कालखंड नोकरीतील व्यक्तींना त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.
दि. १६/१२/२०१७ ते दि. १३/०२/२०१८
दि. १५/०५/२०१८ ते दि. १४/०६/२०१८

खालील कालखंड नोकरीतील व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे ठरतील.
दि. १५/०२/२०१८ ते दि. १७/०३/२०१८
दि. १५/०६/२०१८ ते दि. १६/०७/२०१८
दि. २०/०९/२०१८ ते दि. १७/१०/२०१८

प्रॉपर्टी
मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष प्रॉपर्टी, गाडी, बंगला, जागा, जमिनी, प्लॉट, फ्लॅट, वाहन खरेदी यासाठर्ी सर्वसामान्य राहणार आहे. या वर्षात मिथुन व्यक्तींना प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काहीवेळा विलंबाला सामोरे जावे लागणार आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भातील महत्त्वाची कामे रखडल्यास निराश होऊ नये. यावर्षी मिथुन राशीच्या व्यक्तींनी प्रॉपर्टीच्या संदर्भातील व्यवहारांमध्ये आपण कोठेही अडकणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच आपण इतरांच्या गुंतवणुकीच्या कामांमध्ये अडकणार नाही याची देखील काळजी घ्यावी.

खालील कालखंड प्रॉपर्टी, जागा, गुंतवणूक, वाहन खरेदी यासाठी सौख्यकारक ठरतील.
दि. २०/१०/२०१७ ते दि. ३१/१०/२०१७
दि. १५/०२/२०१८ ते दि. १७/०३/२०१८
दि. ०१/०४/२०१८ ते दि. २६/०५/२०१८
दि. २६/०६/२०१८ ते दि. ०२/०९/२०१८
दि. १९/०९/२०१८ ते दि. १०/१०/२०१८

खालील कालखंडात प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.
दि. १०/११/२०१७ ते दि. १०/१२/२०१७
दि. २७/०५/२०१८ ते दि. ०९/०६/२०१८
दि. २७/१०/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

खालील कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे.
दि. १०/०६/२०१८ ते दि. २५/०६/२०१८

संततीसौख्य
संततीसौख्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश लाभेल. विशेषत: दि. ११ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड हा संततीसौख्यासाठी व विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभण्यासाठी अत्यंत चांगला आहे. या कालखंडात तुमच्या आशा-

आकांक्षा पूर्ण होतील.
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. संततीसौख्य, मुलामुलींची प्रगती, त्यांच्या शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्न, परीक्षांचे निकाल, त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न व त्यांची एकूण प्रगती या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष लाभदायक आहे. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. विद्याíथनींना सुयश लाभेल. मुलामुलींना योग्य शैक्षणिक संस्थेत प्रवेश लाभेल. बरेचसे मुलामुलींच्या व्यक्तिगत पत्रिकेवर अवलंबून राहील.

खालील कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. ०३/११/२०१७ ते दि. २४/११/२०१७
दि. ०७/०२/२०१८ ते दि. १३/०३/२०१८
दि. २५/०३/२०१८ ते दि. १९/०४/२०१८
दि. ०९/०६/२०१८ ते दि. १५/०७/२०१८
दि. ०२/०९/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

खालील कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.
दि. २७/११/२०१७ ते दि. २०/१२/२०१७
दि. १४/०१/२०१८ ते दि. ०५/०२/२०१८
दि. १५/०५/२०१८ ते दि. ०८/०६/२०१८
दि. ०१/०८/२०१८ ते दि. ३१/०८/२०१८

खालील कालखंडात संततीसौख्याच्या संदर्भात थोडा त्रास होण्याची शक्यता आहे.
दि. २०/०४/२०१८ ते दि. १४/०५/२०१८

विवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. आपणास गुरू वर्षभर अनुकूल आहे. तरी सुद्धा दि. ११ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड विवाहेच्छुंचे विवाह जमण्यासाठी जास्त चांगला आहे. या कालखंडात विवाहेच्छुंचे विवाह जमणे व विवाह होणे या दृष्टीने कालखंड चांगला आहे.
दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरच्या कालखंडात ज्यांच्या जीवनामध्ये अगोदरचेच मतभेद आहेत त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हे मतभेद अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालखंडात सामंजस्याने निर्णय घ्यावेत. गरसमजांपासून दूर राहावे. वादविवाद टाळावेत.

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. २०/१०/२०१७ ते दि. २६/१०/२०१७
दि. ०६/०२/२०१८ ते दि. ०१/०३/२०१८
दि. १५/०५/२०१८ ते दि. ०८/०६/२०१८
दि. ०१/०९/२०१८ ते दि. ११/१०/२०१८

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. पती-पत्नीमध्ये मतभेदाची शक्यता आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अगोदरच मतभेद आहेत ते खालील कालखंडात वाढण्याची शक्यता आहे.
दि. २६/१०/२०१७ ते दि. २९/११/२०१७
दि. ०८/०३/२०१८ ते दि. ०१/०५/२०१८

खालील कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे.
दि. ०१/१२/२०१७ ते दि. २०/१२/२०१७
दि. ०१/०८/२०१८ ते दि. ३०/०८/२०१८

प्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक ठरेल. यावर्षी काही विद्यार्थ्यांना शिक्षणानिमित्त प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. तसेच काहींना व्यवसायाच्या उलाढालीकरिता, व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने प्रवासाचे योग येतील. अनेक व्यक्तींना परदेश प्रवासाची संधी मिळेल. अनेकजण तीर्थयात्रेचा लाभ घेऊ शकतील. प्रवास सुखकर होतील.

खालील कालखंड प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगले आहेत.
दि. २०/१०/२०१७ ते दि. १२/११/२०१७
दि. १५/०३/२०१८ ते दि. १४/०५/२०१८
दि. १८/०८/२०१८ ते दि. १४/०९/२०१८
दि. १८/१०/२०१८ ते दि. ०८/११/२०१८

खालील कालखंड प्रवासाच्या दृष्टीने त्रासदायक ठरतील.
दि. १६/१२/२०१७ ते दि. ३१/१२/२०१७
दि. १७/०१/२०१८ ते दि. ०१/०३/२०१८
दि. १५/०५/२०१८ ते दि. १४/०६/२०१८

सुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी व प्रसिद्धीच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. तुमच्या कर्तृत्वाला अपेक्षित संधी लाभणार आहे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती या मुळातच हुशार असतात. कारण मिथुन ही बौद्धिक राशी आहे. त्यामुळे हे वर्ष आपणाला बौद्धिकदृष्टय़ा चांगले जाणार आहे.

हे वर्ष उत्साहाचे आहे. उमेद वाढेल. आशावाद वाढेल. तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. तुमच्या अनुभवाच्या कक्षा विस्तारणार आहेत. नवीन स्नेहसंबंध जुळतील. तुमच्या बुद्धिमत्तेचे चीज होईल. तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. तुमच्या हातून लेखन होईल व त्याला चांगली प्रसिद्धी लाभेल.

नवीन ओळखी व परिचय होतील. तुमच्या आशा-आकांक्षा सफल होणार आहेत. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळणार आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. मानसिक सौख्य लाभेल, प्रसन्नता लाभेल, कौटुंबिक सौख्य लाभेल.

खालील कालखंड सुसंधी व प्रसिद्धी या दृष्टीने यशदायक ठरतील.
दि. २१/१२/२०१७ ते दि. ३१/१२/२०१७
दि. ०७/०२/२०१८ ते दि. १७/०३/२०१८
दि. १५/०४/२०१८ ते दि. १०/०५/२०१८
दि. १७/०८/२०१८ ते दि. १०/१०/२०१८

प्रतिष्ठा, मानसन्मान
मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारपद यादृष्टीने हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. या वर्षी मिथुन व्यक्तींना सार्वजनिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभणार आहे. त्यामुळे हे वर्ष विशेष प्रगतीचे, विकासाचे व लाभाचे जाणार आहे. तुमची पावले पुढे पडणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. तुमच्या कर्तृत्वाला, कर्तबगारीला संधी मिळणार आहे. तुमच्या अनुभवाचे, बुद्धिमत्तेचे चीज होईल.

खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारपद या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील.
दि. २९/१०/२०१७ ते दि. १५/११/२०१७
दि. १३/०२/२०१८ ते दि. १४/०३/२०१८
दि. २५/०३/२०१८ ते दि. २६/०५/२०१८
दि. १३/०८/२०१८ ते दि. १७/०९/२०१८
दि. ०६/१०/२०१८ ते दि. १२/१०/२०१८

वरील कालखंडात आपणास सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी लाभेल. विशेषत: शासकीय क्षेत्रातील अधिका-यांना हा कालखंड यशदायक ठरणार आहे.

खालील कालखंडात मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपण कोणत्याही गरव्यवहारात अडकणार नाही याची दक्षता घ्यावी.
दि. १४/०१/२०१८ ते दि. १२/०२/२०१८
दि. २८/०५/२०१७ ते दि. ०९/०६/२०१७

सारांश, ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष व्यवसाच्या दृष्टीने चांगले आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. परंतु व्यवसायाबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती आहे. बढतीची शक्यता आहे. पगारवाढीची शक्यता आहे. प्रॉपर्टी, जागा, जमिनी, वाहन खरेदी, फ्लॅट, प्लॉट, बंगला या दृष्टीने वर्ष काही प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. काही वेळा प्रॉपर्टीचे व्यवहार विलंबाने होतील. प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने वर्ष चांगले आहे. विवाहांला जे गुरूबळ लागते ते गुरुबळ वर्षभर आहे. त्यामुळे विवाहेच्छुंचे विवाह जमतील. तरीही दि. ११ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा कालखंड हा जास्त चांगला आहे. या कालखंडात वैवाहिक सौख्य लाभेल. संततीसौख्य लाभणार आहे. मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. हे वर्ष नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, आर्थिक लाभ या दृष्टीने सफलतेचे, यशाचे ठरणार आहे.

सुरुवातीला आपण या राशीची काही वैशिष्टय़े पाहिली मात्र ही रास मुळातच द्विस्वभाव आहे. त्यामुळे आपली मन:स्थिती सतत द्विधा असते. त्यामुळे कोणत्याही बाबतीत आपला लवकर निर्णय होत नाही. धरसोडपणा हाच काहींचा स्वभाव बनलेला असतो.

एका ठिकाणी एका विचारावर, एका ध्येयावर लक्ष केंद्रित न होणे हे स्वभावाचे वैशिष्टय़ बनलेले असते. काहीजण सतत जागा बदलतात. व्यवसाय बदलतात. नोक-यांमध्येही सतत बदल करत राहतात. मनाची आंदोलने, मनाचे हेलकावे सतत चालू राहतात. स्वभावात दुटप्पीपणा येतो. बोलण्यात थापेबाजी राहाते. आश्वासनांमध्ये पोकळपणा असतो. स्वभाव संधीसाधू होतो. आपली रास जर बिघडली तर धूर्तपणे इतरांना फसवण्याची वृत्ती तयार होते. तसेच काहीजण प्रत्येक गोष्टीची सतत चिकित्सा करत राहतात. काहीजण दुस-यांचे दोष व उणिवा काढत राहातात. काही संशयी स्वभावाच्या बनतात. काहींची कोठेही श्रद्धा नसते. कशावरही व कोणावरही विश्वास नसतो. काही अंत:करणाच्या रुक्ष व कोरडय़ा बनतात.

मिथुन ही द्विस्वभावी रास आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर आपला निर्णय वेळेवर होत नाही. निर्णय लवकर घेता न येणे हा मिथुन व्यक्तींचा फार मोठा दोष असतो. दुकानात गेल्यावर कोणत्या रंगाची साडी घ्यावी, कोणत्या डिझाईनचे अलंकार घ्यावेत यावर मिथुन स्त्रियांचा निर्णय लवकर होत नाही. कोणता व्यवसाय निवडावा, कोणत्या दिशेला जावे, शिक्षणात कोणती ज्ञान शाखा निवडावी, घर कसे बांधावे, फíनचर कसे असावे या सर्व प्रश्नांमध्ये त्यांची नेहमीच द्विधा मन:स्थिती होत असते. जीवनात हरघडी मिथुन व्यक्तींच्या मनात सारखा गोंधळ असतो. त्यामुळे ब-याच वेळा योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे मिथुन व्यक्तींचे अतोनात नुकसान होत असते. मग त्यांची स्थिती भरकटलेल्या अधारहीन पतंगासारखी होते. प्रत्येक व्यक्तीला पावला पावलावर निर्णय घ्यावेच लागतात. द्विधा मन:स्थितीमुळे माणसाची शक्ती कमी होते. एकवेळ निर्णय चुकला तरी चालेल मात्र निर्णय न घेता थांबल्याने पूर्ण नुकसान होते.

सारांश, शंका-कुशंका, अविश्वास फेकून श्रद्धा व विश्वास स्थिर विचार, निर्णयाला चिकटून राहण्याची वृत्ती जोपासलीत तर तुमच्या ज्ञानाने, अनुभवाने, प्रतिभेने, बुद्धिमत्तेने सा-या जगाच्या वैभवात तुम्ही मोलाची भर टाकू शकाल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट