मिरकरवाडा बंदरातील कामासाठी जेवढा लागेल तेवढा निधी द्यायला सरकार तयार आहे, पण कामाचा दर्जा योग्य हवा. कामाबाबत पुन्हा-पुन्हा स्थानिकांच्या तक्रारी येता कामा नयेत. बंदरातील गाळाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला पाहिजे, असे प्रतिपादन मत्स्यमंत्री महादेव जानकर यांनी केले.
रत्नागिरी- मिरकरवाडा बंदरातील कामासाठी जेवढा लागेल तेवढा निधी द्यायला सरकार तयार आहे, पण कामाचा दर्जा योग्य हवा. कामाबाबत पुन्हा-पुन्हा स्थानिकांच्या तक्रारी येता कामा नयेत. बंदरातील गाळाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला पाहिजे, असे प्रतिपादन मत्स्यमंत्री महादेव जानकर यांनी केले.
मिरकरवाडा बंदरातील टप्पा २ मधील कामांची ना. जानकर यांनी पाहणी केली. येत्या सहा महिन्यात या कामाचे उद्घाटन करा अशा सूचना श्री. जानकर यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले, राज्यासह जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे; मात्र आतापर्यंत महाराष्ट्र मत्स्य विकासात तामिळनाडू, झारखंड, गुजरातच्या मागे आहे. मत्स्योत्पादनात महाराष्ट्र देशात नंबर वन राहिला पाहीजे.
त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. मिरकरवाडा बंदर विकास हा त्याचच एक भाग आहे. ते राज्यातील आदर्श बंदर म्हणून विकसित केले जाणार आहे. पीपीपी तत्त्वावर महाराष्ट्र फिशफिडचे अकरा कारखाने सुरु करण्यात येणार आहे. फिशफिडसाठी येथील मासळी पंजाबमध्ये जाते. त्यावर आधारीत उद्योग सुरु करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे. उत्पन्न वाढीसाठी राज्यात ३३ हॅचरीजना मंजुरी दिली आहे. वाद न करता विकासासाठी पक्ष विसरुन सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. पक्षाचा विचार करु नका, कोणत्या अधिका-याकडून चुका होत असतील तर त्याला घरी पाठविले जाईल. जलयुक्तच्या धर्तीवर राज्यात लोकवगर्णीतून जेटी उभारण्याचा मानस आहे.
जेटी आयएसओ बनविण्यासाठी पुढे आले पाहिजे. शासन आपल्याला निधी देणार आहेच पण मच्छीमारांच्या खिशातले पैसे काढण्यासाठीच मी येथे आलो आहे असे सांगत मच्छीमारांनी जेटी विकासासाठी पुढे यायले हवे असे आवाहन केले.सेस वसुलीतून मच्छीमारांची सुटका करणार का असा प्रश्न मच्छीमारांनी उपस्थित केला. त्यावर श्री. जानकर म्हणाले की मत्स्य विभागास कृषीप्रमाणेच दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आला आहे.
त्याला मंजुरी मिळाली की कृषी मालाप्रमाणेच मच्छीवरील सेसमधून सुटका होईल. येत्या काही दिवसात त्यावर निर्णय होईल. बंदरातील स्वच्छता पाहून मला आतमध्ये प्रवेश करण्याची इच्छाच होत नव्हती, अशी खंत श्री. जानकर यांनी सर्व मच्छीमारांपुढे व्यक्त केली. या बंदरातील मासळी परदेशात जाणार आहे. येथील स्वच्छता पाहिल्यानंतर परदेशी लोकं स्वच्छतेच्या मुद्दय़ावर मासळी खरेदीचा करार रद्द करतील. त्यासाठी मच्छीमारांनी एकत्रित येऊन स्वच्छता अभियान राबवा, अशी सूचना केली.
[EPSB]
[/EPSB]