वाहनांची वाढलेली संख्या, दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी, भरीस भर म्हणून अनेक ठिकाणी सुरु असलेली रस्त्यांची, मेट्रोची कामे त्यामुळे मुंबईकर प्रवाशांची अक्षरश: कोंडी झाली आहे.
मुंबई- वाहनांची वाढलेली संख्या, दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी, भरीस भर म्हणून अनेक ठिकाणी सुरु असलेली रस्त्यांची, मेट्रोची कामे त्यामुळे मुंबईकर प्रवाशांची अक्षरश: कोंडी झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीने प्रवासाच्या वेळेत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि तुलसी पाईप रोड (दादर ते लोअर परळ) या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यावर्षी ऑगस्टमध्ये प्रवासी वेळेत वाढ झाल्याचे निरीक्षण या अॅपने नोंदवले आहे. ऐन गर्दीच्या म्हणजेच सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत वाहनांचा वेग मंदावलेला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनाचा वेग प्रतितास ५ किलो मीटरने कमी झाला आहे.
पश्चिमद्रुतगती महामार्गावरून सुसाट धावणा-या वाहनांच्या वेगातही सरासरीने घट झाली आहे. ऑगस्टमध्ये सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत वाहनांचा वेग २३ किलोमीटर प्रतितासापयर्ंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये हाच वेग सरासरी २७ किलोमीटर प्रतितास होता. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील वाहनांच्या वेगातही घट झाली आहे. ६० किलोमीटर प्रतितास असलेला वेग ५२ किलोमीटर प्रतितास झाला आहे. याशिवाय मुंबईतील इतर मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे तेथील प्रवासाच्या वेळेतही कमालीची घट झालेली दिसून येत आहे.
मेट्रो ७ (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) आणि मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग) च्या कामांमुळं वाहतूक कोंडीचा सामना करत असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहनचालक करत आहेत. याबाबत एमएमआरडीएचे प्रकल्प सहसंचालक दिलीप कवठकर म्हणाले, की या मार्गांवरील वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने हे वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. पावसाळ्यापयर्ंत ही समस्या राहील. पुढील वर्षी या रस्त्यांवरील वाहतूक सेवा सुरळीत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
[EPSB]
कर संकलनातून मिळालेले अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न, सकल राष्ट्रीय उत्पन्नात झालेली घट यामुळे मोदी सरकारसमोरील आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
[/EPSB]