गोव्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले मनोहर गोपालकृष्णप्रभू पर्रिकर हे ६२ वर्षाचे गोव्यामधील भाजपाचे सर्वात लोकप्रिय नेते असून, शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.
गोव्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले मनोहर गोपालकृष्णप्रभू पर्रिकर हे ६२ वर्षाचे गोव्यामधील भाजपाचे सर्वात लोकप्रिय नेते असून, शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना बोलावून घेतल्यानंतर राज्यसभेत त्यांची निवड त्यावेळच्या उत्तर प्रदेशमधील भाजप आमदाराच्या कोटय़ामधून झाली होती.
आता संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा पर्रिकर यांना द्यावा लागेल. मात्र गोवा विधानसभेचे ते सदस्य नसल्यामुळे सहा महिन्यांच्या आत गोवा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर ते राज्यसभेचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे.
श्री. पर्रिकर हे मूळचे म्हापसा येथील असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हापासा येथे आणि?माध्यमिक शिक्षण गोव्यात झाले. मुंबईच्या आय.आय.टी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथेच त्यांनी इंजिनीअरिंग या विषयातील पदवी संपादन केली.
आय. आय. टी मधून इंजिनीअर झालेल्या आणि नंतर गोव्याचे मुख्यमंत्री झालेले ते देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत. आय. आय. टी मध्ये ते बुद्धिमान विद्यार्थी म्हणून गणले जात होते. इंजिनीअरिंगच्या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला म्हणून २००१ साली मुंबईच्या आयआयटीने त्यांना सन्मानित केले होते.
वयाच्या २६ व्या वर्षी उत्तर गोव्याचे संघशाखाप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. राम जन्मभूमी बाबरी मशीद वादात त्यांनी झालेल्या आंदोलनात भाग घेतला होता. जनसंघाचे जनता पक्षात विलिनीकरण झाल्यानंतर श्री पर्रिकर हे गोवा विधानसभेत १९९४ साली प्रथम निवडून आले आणि त्यावेळच्या विधानसभेतील ते विरोधी पक्षनेते झाले.
२४ऑक्टोबर २००० रोजी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रथम संधी मिळाली. मात्र ही अल्पकाळाची संधी होती. पाच जून २००२ रोजी झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा विधानसभेत निवडून येऊन भाजपाचे मुख्यमंत्री झाले.
२००५ सालातच गोवा विधानसभेतील भाजपाचे विधानसभेतील मताधिक्य घटल्यामुळे पर्रिकर यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. दिगंबर कामत यांनी भाजपामधील एक गट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पर्रिकर यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. परंतु नंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा मनोहर पर्रिकर यांनी भाजपाला बहुमत मिळवून दिले आणि ते राज्याचे तिस-यांदा मुख्यमंत्री झाले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आणि त्यांच्या पक्षाला पूर्ण मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरक्षण मंत्रीपदाची तात्पुरती जबाबदारी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे सोपवली होती. मे २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या काळात जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाचा अधिभार होता.
नोव्हेंबर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रिकर यांना संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली ती १३ मार्च?२०१७ पर्यंत त्यांनी सांभाळली. गोव्यामधील निवडणुकीत अल्पमतात असलेल्या भाजपाने सत्तेचा दावा केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी मनोहर पर्रिकर यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी एकमुखी मागणी केल्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा मिळवण्यात पर्रिकर यांना यश आले आणि १४ मार्च २०१७ रोजी गोव्याचे ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.