भाजपाच्या कमाल चीन्हाचीच पावती निघत असल्याचे प्रकरण केंद्र सरकारने गांभीयार्ने घेतले असून या प्रकरणी यंत्राची तपासणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक भिंड येथे दाखल झाले आहे.
ग्वाल्हेर- मध्यप्रदेशातील भिंड येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक सुरु असताना, कोणालाही मत दिले तरी भाजपाच्या कमाल चीन्हाचीच पावती निघत असल्याचे प्रकरण केंद्र सरकारने गांभीयार्ने घेतले असून या प्रकरणी यंत्राची तपासणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक भिंड येथे दाखल झाले आहे.
व्होट व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT ) तपासणीदरम्यान मतदान यंत्राची (EVM) दोन वेगवेगळे बटन दाबले तरी स्लिप ‘कमळ’चिन्हाची निघाली. इव्हीएम मधील या घोटाळ्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे (ईसी) केली आहे. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारकडून अहवाल मागवला असून मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी सलिना सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने भिंड जिल्ह्यातील पोट निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात 9 एप्रिल रोजी अटेर विधानसभा पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सत्यदेव कटारे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी अटेर विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी डमी इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी (व्होट व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) च्या चाचणीत मोठे गौडबंगाल पुढे आले आहे.
निवडणूक आयोगाने हे प्रकरण गांभीयार्ने घेतले असून पोट निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त भंवरलाल यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व व्होटिंग मशिन आणि व्हीव्हीपीएटी यांचे सर्व राजकीय पक्षांना डेमो देणार आहे. एवढेच नाही तर निवडणूक झाल्यानंतर मतमोजणीपर्यंत समिती भिंडमध्ये उपस्थित राहाणार आहे.
विरोधक एकवटले
हे प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने दिल्लीत निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजयसिंह, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आयोगाला या गोंधळाची माहिती दिली होती.
त्यासोबतच अटेर आणि बांधवगड येथील पोटनिवडणूक बॅलेट पेपरने घेण्याची मागणी केली होती. इव्हीएमच्या दलदलीतून ‘कमळ’च फुलत असल्याचा आरोप केजारीवाल यांनी केला आहे.