मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे लॉच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत दोन दिवसांत संपत असल्याने अनेकांच्या प्रवेशापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे लॉच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत दोन दिवसांत संपत असल्याने अनेकांच्या प्रवेशापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यातच अनेकांनी फेरतपासणीसाठी मागणी केली असून, त्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळात नुकताच लॉच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर आला होता. यात ‘पुराव्याचा कायदा’ या एकाच विषयात अनेक विद्यार्थी नापास झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या. या विषयांत विद्यार्थ्यांना ५० ते ६० गुण मिळाले असताना एकाच विषयात १०, १५ ते २५, ३० असे गुण देण्यात आले आहेत.
यामध्ये गेल्या परीक्षेतील टॉपर्स असलेले विद्यार्थीही नापास झाल्याचे समोर आले होते. यातील अनेक विद्यार्थ्यांनी पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यांना नापास ठरविले असताना पुढील प्रवेश घ्यावयाचा कसा, असा प्रश्न पडला आहे.
यातील शेकडो विद्यार्थ्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत, पण प्रवेश पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत असल्याने इतक्या कमी वेळेत पेपर तपासून होणे शक्य नसल्याने त्यांचे प्रवेश अडचणीत येतील, अशी शक्यता वर्तविण्यात आले.