राज्याच्या स्थापनेपासून राजकीय दृष्टया अस्थिर राहिलेल्या झारखंडमध्ये पहिल्यांदाच भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होणार आहे.
रांची – राज्याच्या स्थापनेपासून राजकीय दृष्टया अस्थिर राहिलेल्या झारखंडमध्ये पहिल्यांदाच भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्याला ३८ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या एजेएसयू पक्षाला पाच जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे १४ वर्षानंतर राज्यात प्रथमच एक स्थिर सरकार मिळणार आहे.
८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत ६०.०३ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली होती. अखेर भाजपने ८१ पैकी ३७ जागांवर विजय प्राप्त केला. तर सत्ताधाीर झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला १९ जागा मिळाल्या आहेत. झारखंड विकास मोर्चाला आठ तर काँग्रेस सहा जागांवर समाधान मानावे लागले.
स्थिर सरकार आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे ठरले. झारखंडच्या अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वत: दुमकामधून पराभूत झाले मात्र बारहेतमधून विजयी झाले. त्यांनी दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांसाठी ६६.०३ टक्के मतदान झाले होते. नक्षलवाद्यांच्या धोक्यामुळे झारखंडमध्येही पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले.
२०००मध्ये बिहारपासून स्वंतत्र झालेल्या या राज्याने गेल्या १४ वर्षात नऊ सरकारे पाहिली आहेत तर तीन वर्ष राष्ट्रपती राजवटही पाहिली आहे. २००५ आणि २००९मध्ये स्पष्ट बहुमताअभावी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
झारखंडमधल्या मतदारांनी विशेषत तरुण मतदारांनी भाजपला मतदान केल्याने झारखंडमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.