समाजातील आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सत्तेत बसलेले राजकारणी मंडळी स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहेत.
मुंबई- समाजातील आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सत्तेत बसलेले राजकारणी मंडळी स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहेत. त्यात आपण तरी का मागे राहायचे? या उद्देशाने देशातील एकूण ६ राज्यांत विखुरलेल्या लिंगायतांनीही आपल्या अस्तित्वाची जाणीव राज्यकर्त्यांना करून देण्यासाठी ‘लिंगायत आरक्षण समिती’च्या माध्यमातून एकत्र येऊन लिंगायत ऐक्याची खूणगाठ बांधली पाहिजे.
लिंगायत ऐक्यासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. संगमेश्वर पानगावे यांनी केले आहे. लातूरच्या बसवेश्वर चौकात लिंगायत आरक्षण अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लिंगायत समाजातील बांधवांचे सहकार्य लाभले तर हे अभियान २१ नोव्हेंबपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात राबवले जाईल.
त्यासाठी सकल समाज बांधवांनी आपापल्या क्षेत्राची धुरा सांभाळत एका छताखाली येण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही प्रा. पानगावे म्हणाले. एकीकडे लिंगायत समाजाला झोपलेला आणि भित्रा समाज म्हणून समजला जातो. परंतु प्रत्यक्षात या समाजाच्या सहिष्णुता आणि संयमी वृत्तीला जर कोणी कवकुवत समजत असेल तर वेळ आल्यावर ‘देवादि देव महादेवाचा रुद्र अवतार धारण’ करणारा हा समाज असल्याची जाणीवही प्रा. पानगावे यांनी करून दिली.
याप्रसंगी लिंगायत एकीकरण समितीचे प्रा. संगमेश्वर पानगावे, अॅड. विश्वनाथ खोबरे, शरणप्पा अंबुलगे, उमाकांत पंचाक्षरी, बस्वराज सुलगुडले, मनोज मोठे, रजनीकांत केवळराम, आदी उपस्थित होते.
‘लिंगायत एकीकरण समिती’चा उद्देश
लिंगायत धर्मातील सर्व जाती-उपजाती व पोटजातीतील लोकांना संरक्षण हक्क मिळाला पाहिजे, शैक्षणिक, नोकरीत, राजकारणात, धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जा, महात्मा बसवेश्वर स्मारक मंगळवेढा, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, कपिलधार मांजरसुंबा-भक्ती स्थळ गुगदळ अहमदपूर तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ, राष्ट्रसंत यांना भारतरत्न गाव तीर्थ स्मशानभूमी, वसतिगृहे असावी, अशा अनेक मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लोकहितकारी चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही समितीद्वारे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व तालुके, जिल्ह्यांचा सहभाग, १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०१६