भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीने परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचे करण्याची शिफारस केली आहे.
नवी दिल्ली- भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीने परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचे करण्याची शिफारस केली आहे. परदेशात राहणा-या जोडप्याच्या लग्नाची नोंदणी भारतात होण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पती – पत्नीमध्ये कोणताही वादविवाद झाल्यास प्रकरण योग्यरित्या हाताळण्यासाठी तज्ञांच्या समितीने ही शिफारस केली आहे. परदेशात एनआरआय पतींकडून भारतीय महिलांचा छळ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तसेच अनेक महिलांना घरगुती हिंसाचाराचा त्रास सहन करावा लागत आहे. आधार सक्तीचे केल्यास अशा महिलांना त्यांचे अधिकार मिळणार आहे.
[EPSB]
झहीर आणि सागरिकाच्या लग्नाची तारीख ठरली
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
[/EPSB]