मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना ८४ आणि भाजप ८३ अशी स्थिती झाली आहे.
मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना ८४ आणि भाजप ८३ अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुले आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप ८४ आणि शिवसेना ८३ अशी होईल आणि आमचा महापौर होईल, असे आव्हान भाजपा खासदार किरीट सोमय्यांनी दिले आहे. दरम्यान, महापलिकेतील शिवसेनेची माफियागिरी उद्ध्वस्त करण्याचे भाजपचे प्रयत्न लवकरच यशस्वी होतील, असा विश्वासही सोमय्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेवर टीका करतानाच सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा आता तरी कमी होणार का?’ असे म्हणत सोमय्या यांनी तोफ डागली. मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही सोमय्या यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर बरीच टीका केली होती. त्यावेळी शिवसेनेकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले होते. मात्र, भांडुप पोटनिवडणुकीतील पराभवनंतर सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवर तोंडसुख घेतले आहे. कंत्राट माफियावरुन एवढे आरोप झाले तरी, हम नहीं सुधरेंगे, अशी शिवसेनेची प्रवृत्ती आहे. त्यामुळेच हा पराभव झाला आहे,’ अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे.
[EPSB]
[/EPSB]