राज्य शासनाने शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना निरनिराळ्या अटी शर्तीसह घोषित केली आहे.
जव्हार- राज्य शासनाने शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना निरनिराळ्या अटी शर्तीसह घोषित केली आहे. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आदिवासी शेतक-यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागत असल्याने सेतू तसेच सुविधा केंद्रावर शेतक-यांची झुंबड उडते आहे. परंतु सव्र्हर डाऊन, बायोमेट्रिक यांसारख्या तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरले जात नसल्याने शेतक-यांसह सुविधा केंद्रावरील कर्मचा-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासनाने त्वरित या अडचणी दूर करून तालुक्यातील आदिवासी शेतक-यांना सहकार्य करावे अशी मागणी जोर धरत आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना ऑनलाईन अर्ज सादर करताना आधार क्रमांक तसेच अर्जाचा तपशील इत्यादी माहितीसह करून तो संगणकावर फिलप करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाने या समस्येवर तोडगा काढत विभागीय तसेच जिल्हास्तरावर सव्र्हर सेंटरची निर्मिती करून तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी जव्हार तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
[EPSB]
नांदगाव येथील छाप्यात ५२ हजारांचे लाकूड जप्त
बेकायदेशीररीत्या सागवानी आणि शिसव जातीची लाकडे जप्त
[/EPSB]