जव्हार शहरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतीगृहाची दुरावस्था झाली असून, वसतिगृहात राहून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांची गैरसोय निर्माण झाली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना जुनाट व मोडकळीस इमारतीत राहावे लागत आहे.
जव्हार- जव्हार शहरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतीगृहाची दुरावस्था झाली असून, वसतिगृहात राहून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांची गैरसोय निर्माण झाली आहे. प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थाना जुनाट व मोडकळीस इमारतीत राहावे लागत आहे.
जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात वाडा, मोखाडा, पालघर, धुळे, जळगाव येथील मुलं औद्योगिक प्रशिक्षणासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात ४२ विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी राहत असून, जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डिझेल मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक, वायरमन, फिटर, वेल्डर, कॉम्पुटर, हार्डवेअर, ड्रेस मेकिंग, मोटर मॅकेनिक, याचे प्रशिक्षण औद्योगिक संस्थेत प्रशिक्षण दिले जात आहे.
मात्र जव्हार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुर्लक्षामुळे वसतिगृहाची दुरावस्था झाली असून, जुनी, मोडकळीस इमारत, वसतिगृहाच्या खोल्यांना घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या खोल्यांना घाण पसरली असून, वसतिगृहाला लागून गवत आणि जंगल असल्याने, डांस, सर्प याची भीती विद्यार्थांना आहे.
तसेच वसतिगृहाचे दरवाजे खिडक्या मोडकळीस झाल्या आहेत. वसतिगृहाच्या काही खोल्यांना पंखे बसविले आहेत. परंतु तेही पंखे बंद पडले आहेत. वसतिगृहात पिण्यासाठी पाणी नाही. सौचालायमध्ये पाणी नाही. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न विद्यार्थाना पडला आहे.
जव्हारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात भगवान घेरडे हे गृहपाल आहेत. तसेच गृहपाल हे आठवडय़ातील शनिवार पासून ते सोमवापर्यंत ते वसतिगृहात अजिबात राहत नाहीत. असे विद्यार्थ्यांनी त्याच्या अडचणी, समस्या सांगितल्या. प्रशिक्षण
देणाऱ्या शिक्षकांच्या भीतीमुळे विद्यार्थी खरी माहिती सांगायला घाबरत असल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अडीअडचणी कोण्हाकडे मांडायच्या अशी अडचण विद्यार्थाना सतत भेडसावत आहे.
[EPSB]
मॅनहोलचे संकट कायम!
ऑगस्ट महिन्यात तुफानी पावसाने मुंबई आणि ठाणे परिसराला पुन्हा एकदा दणका दिला. प्लास्टिक पिशव्या-थमार्कोलचा भस्मासूर, नालेसफाईचा बोजवारा, पर्जन्यपाणी वाहून नेण्याची क्षीण झालेली यंत्रणा या नेहमीच्या बाबी मुंबई तुंबण्यास कारणीभूत असतानाच, या पावसात उघडय़ा मॅनहोलचा मुद्दा पुढे आला.
[/EPSB]