शहिदांचा अपमान करणा-या नालायक नेत्यांना ठार मारा, असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थान सरकारमधील मंत्री राजकुमार रिणवा यांनी केले आहे.
सिकर- शहिदांचा अपमान करणा-या नालायक नेत्यांना ठार मारा, असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थान सरकारमधील मंत्री राजकुमार रिणवा यांनी केले आहे.
सिकर जिल्ह्यातील कोलिडा गावात शहिद केशव देव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला रिणवा उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
‘जवान ५० डिग्री ते ० डिग्री सेल्सिअसमध्ये राहून आपल्या देशाची सुरक्षा करत असतात. पण काही नेते त्यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करतात. अशा नेत्यांचे तुकडे केले पाहिजेत. यासाठी राज्यघटनेत तरतूदही असली पाहिजे. असे करणा-यांवर कोणता गुन्हा दाखल करु नका, पाच मिनिटात त्यांना ठार केले पाहिजे’, असे राजकुमार रिणवा बोलले.
राजकुमार रिणवा यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात नेत्यांचा नालायक असा उल्लेख केल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.