दुसरी कसोटी ७५ धावांनी जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यजमानांचे १८८ धावांचे आव्हान पाहुण्यांना पेलवले नाही.
बंगळूरु- दुसरी कसोटी ७५ धावांनी जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यजमानांचे १८८ धावांचे आव्हान पाहुण्यांना पेलवले नाही. चौथ्या दिवशी चहापानानंतर त्यांचा डाव ११२ धावांत संपला. ऑफस्पिनर आर. अश्विनने ६ विकेट घेत भारताला बरोबरी साधून देण्यात मोलाचावाटा उचलला.
फलंदाजीतील सातत्य पाहता ऑस्ट्रेलिया १८८ धावांचे आव्हान सहज पार करेल, असे वाटले. मात्र अश्विनचा ‘टॉपस्पिन’ चालला आणि जेमतेम एका सत्रात पाहुण्यांचा डाव आटोपला. अश्विनने ४१ धावांत ६ विकेट घेतल्या.
डावात पाच किंवा त्यातून अधिक विकेट घेण्याची ही त्याची २५वी वेळ आहे. ऑस्ट्रेलियातर्फे केवळ चार फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात कर्णधार स्टीव्हन स्मिथचे सर्वाधिक २८ धावांचे योगदान आहे.