देशभरात करवाचौथ हा सण साजरा झाला. परंतु या शहरात लोकांना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. आदर्शनगरचे निवासी विनोद आणि लक्ष्मीने नुकतेच लव्ह मॅरेज केले होते.
मोहाली- देशभरात करवाचौथ हा सण साजरा झाला. परंतु या शहरात लोकांना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. आदर्शनगरचे निवासी विनोद आणि लक्ष्मीने नुकतेच लव्ह मॅरेज केले होते. लक्ष्मीला लहानपणापासूनच दोन हात आणि पाय नाहीत. तिच्या आईने तिच्या लग्नाची आशाच सोडली होती, पण देवाच्या मंदिरात लक्ष्मीला विनोदच्या रूपाने जीवनसाथी भेटला. तथापि, विनोदचा एक पाय नीट कार्यरत नाही. नुकतेच लक्ष्मीने विनोदसाठी करवा चौथचे व्रत ठेवले आणि ते पूर्ण केले.
नवी साडी आणि श्रुंगारासह करवा चौथसाठी तयार होऊन लक्ष्मी मंदिरात जाऊ लागली, तेव्हा तिने पती विनोदचा आधार घेतला. हात आणि पाय नसल्याने तिची देखभाल तिची आई चंद्रकला याच करतात. हसत-हसत लक्ष्मी म्हणते की, आयुष्यात देवाने हात-पाय भलेही दिले नसतील, पण असा पती दिला जो माझी पदोपदी काळजी घेतो, प्रत्येक गरज पूर्ण करतो. लकवा झालेल्या पायामुळे कुबडय़ांच्या आधारे चालणारा विनोद म्हणाला की, काही दिवसांपूर्वीच आमचे लग्न झाले.
लक्ष्मी दोन्ही हात नसल्याने पूजेची थाळी आणि छन्नी पकडू शकत नव्हती, म्हणून विनोदनेच छन्नी आणि पूजेची थाळी हातात घेतली आणि मग लक्ष्मीने त्यातून विनोदचा चेहरा पाहिला. २४ वर्षीय लक्ष्मी लहानपणापासून दिव्यांग आहे आणि विनोद पोलिओने ग्रस्त. दोघांची भेट एका मंदिरात झाली. दोघेही दीड वर्षाच्या प्रेमानंतर लग्नबंधनात अडकले. प्रत्येक सुखदु:खात साथ देण्याचे दिले आहे वचन विनोद आणि लक्ष्मीने म्हटले की, आतापर्यंत आम्ही स्वत:ला अपूर्ण समजत होतो. पण, जेव्हा एकमेकांची भेट घेतली तेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो. एकमेकांना भेटल्यावर आम्हाला पूर्णत्व आले. यानंतर त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी प्रत्येक सुखदु:खात एकमेकांना सोबत करण्याचे वचन दिले आहे.
[EPSB]
जगभर सध्या शरीरावर गोंदण्याची (टॅटू) फॅशन चालत आहे. भारतासारख्या देशात हा परंपरेचा भाग आहे. बहुतांश लोक टॅटूला कला मानतात, मात्र जपानचे न्यायालय याच्या बाजूने नाही.
[/EPSB]