Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeसंपादकीयविशेष लेखसरकारी तिजोरीचे रडगाणे गरिबांच्या मुळावर!

सरकारी तिजोरीचे रडगाणे गरिबांच्या मुळावर!

देशातील गरिबांना न्याय देण्यासाठी सरकार आर्थिकदृष्टय़ा सक्षम असावे लागते. करांच्या मार्गाने स्वच्छ महसूल मिळाला तरच ते शक्य असते. पण भारतासारख्या देशात करसंकलनाविषयी विचारी लोकही बोलत नाहीत, ही मोठीच त्रुटी आहे. हा पेच ज्यांच्या लक्षात येतो, त्यांनी त्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.

tax collageसरकारची आर्थिक स्थिती चांगली आहे, असे आपल्या अर्थमंत्र्यांना वेळोवेळी सांगावे लागते. चालू आर्थिक वर्षे निम्म्यावर आले असताना अरुण जेटली यांनी तसे सांगितले आहे. पण सरकारला मिळणारा कर हा कसा कोणत्याही सरकारचा स्वच्छ महसूल असतो आणि त्यावरच सरकार गरजू किंवा गरीब जनतेसाठी काही ठोस काम करू शकते, हे कसे विचारी माणसांनी समजून घेतले पाहिजे, याकडे आपल्या देशात पुरेसे लक्ष दिले जात नाही. आता जेव्हा सामाजिक योजनांसाठीचा खर्च वाढत चालला असल्याने सरकारला हा विषय सतत बोलणे भाग पडले आहे.

अमेरिकेसारख्या विकसित देशात करसंकलनाच्या विषयाला अतिशय महत्त्व आहे, कारण सरकार आर्थिकदृष्टय़ा सक्षम असले पाहिजे, ही गरज त्या समाजाला पटली आहे. त्यामुळेच तेथे सध्या सुरू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत करसंकलन हा विषय चर्चेत आला आहे. करांच्या बाबतीत कोण, काय निर्णय घेणार, हे तेथे जनता जाणून घेते आणि त्यानुसार मतदान करते. कर बुडविणे हा तेथे फार गंभीर गुन्हा मानला जातो. सध्याचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प त्यामुळेच अडचणीत आले असून त्यांना त्याचे समर्थन करणे जड चालले आहे. आपण कर बुडविलेला नाही, वॉरेन बफेट यांच्याप्रमाणेच करसवलतीचा भरपूर फायदा घेतला आहे, असा दावा ट्रम्प यांनी अलीकडेच केला. पण जगातील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत असलेल्या बफेट यांनी ट्रम्प यांचे दात लगेच त्यांच्याच घशात घातले. आपण कधीही कर बुडविलेले नाही, आपण १९४४ पासून म्हणजे १३ वर्षाचे असल्यापासून कसा नियमित कर भरतो, असे या ८६ वर्षाच्या प्रामाणिक करदात्याने जाहीर केले. गुंतवणुकीच्या माध्यमातून कोटय़वधी डॉलरवर बसलेल्या बफेट यांना आता मिळवायचे काहीच राहिलेले नाही, पण कर बुडवून संपत्ती जमा करणे, हे अमेरिकेत अपमानास्पद मानतात. त्यामुळे एरवी राजकारणात न पडणा-या बफेट यांनी ट्रम्प यांचे म्हणणे आकडेवारीनिशी खोडून काढले. मुद्दा अमेरिकेत काय चालले हा नसून आपला देश, आपले सरकार करांवर चालते, ते आपण प्रामाणिकपणे दिले तरच आपल्याला देशभक्तीपर बोलण्याचा अधिकार आहे, हे समजून घेतले पाहिजे.

सरकारने शेतक-यांना मदत केली पाहिजे, शिक्षण आणि आरोग्यावरील तरतूद वाढविली पाहिजे, समाजातील असंघटित आणि दुर्बल घटकांना मदत केली पाहिजे, नव्याने सेवेत येणा-या कर्मचा-यांना पेन्शन दिली पाहिजे, पायाभूत सुविधांवर खर्च केला पाहिजे, कायम युद्धसज्जता ठेवली पाहिजे, सर्व सरकारी सेवा सवलतीत दिल्या पाहिजेत, अशा अनेक विषयांवर आपल्याकडे आंदोलने होतात. पण हे सर्व करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पुरेसा पैसा लागतो, याकडे अनेक जण सोयीस्कर दुर्लक्ष करतात. हे सर्व करण्यासाठी करव्यवस्था सुधारली पाहिजे आणि सरकारचे दारिद्रय़ संपविले पाहिजे, असे आंदोलन आपल्या देशात होत नाही. श्रीमंत नागरिकांकडून कर चांगल्या मार्गाने घेऊन समाजाचे सार्वजनिक जीवन दर्जेदार करणे, ही कोणत्याही सरकारची जबाबदारी असते. ती व्यक्ती म्हणून किंवा पक्ष म्हणून नसते तर सरकार म्हणून असते. जगाच्या पाठीवर कोठेही हे असेच असते. त्यामुळे जीडीपीत करसंकलनाचा वाटा किती आहे, आणि तो कसा वाढता राहील, याची काळजी प्रगत देश म्हणजे प्रगत मानवी समूह घेत असतात. त्यामुळेच तो हिस्सा ज्या देशांत चांगला म्हणजे ३० टक्क्यांवर असतो, त्या देशात सरकारचा सार्वजनिक जीवनावरील प्रभाव जाणवण्यासारखा असतो. कारण काहीही करायचे म्हटले की त्याची तरतूद करण्याची ताकद त्या सरकारची असते. आपल्याकडे हा हिस्सा कसाबसा १५ ते १६ टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे सरकार सतत तुटीचा कारभार करत असते. समाजाकडून सतराशे साठ मागण्या तर येत असतात, पण ते काहीच करू शकत नाही. कारण त्याची ती आíथक कुवतच नसते. आज आपला सारा देश २२ लाख कोटी रुपयांत चालतो. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकूण कर आणि सरकारचे इतर उत्पन्न एवढेच आहे. त्यामुळे सरकारची आíथक स्थिती कशी आहे, याचा खुलासा सतत करावा लागतो.

एवढय़ा मोठय़ा आणि १३० कोटी लोकसंख्येच्या देशात नसíगक संकटे येतात तसेच दारिद्रय़ रेषेखालील २२ कोटी जनतेला मदत करावयाची असते. त्यामुळे अर्थसंकल्पात काहीही ठरविले असले तरी ऐनवेळी उद्भवणारे खर्च खूप असतात. ते सरकारला टाळता येत नाहीत. पण या वर्षीचा महसूल लक्षात घेता ठरल्यापेक्षा अधिक खर्च करता येणार नाही, अशा सूचना अर्थमंत्री जेटली यांना नुकत्याच द्याव्या लागल्या आहेत. स्पेक्ट्रमच्या लिलावातून ६४ हजार कोटी मिळणे अपेक्षित होते, पण मिळाले ३२ हजार कोटी. रिझर्व्ह बँक दरवर्षी लाभांश म्हणून सरकारला दरवर्षी ६६ हजार कोटी देते, ते यावर्षीही मिळाले आहेत. काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेत १५ हजार कोटी अतिरिक्त पैसा तिजोरीत आला आहे. शिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संकलनात वाढ होते आहे. पण एवढे असूनही सरकारी तिजोरी भरत नाही. कमावणारे हात कमी आणि मागणारे हात अधिक, अशी स्थिती वर्षानुवर्षे आहे, ती काही केल्या बदलत नाही.

मार्ग एकच आहे. देशाची जी श्रीमंती काही मोजक्या समूहात दिसते, तिला राष्ट्र उभारणीतील वाटा चांगल्या पद्धतीने उचलण्यास भाग पाडणे. याचे महत्त्व सरकारच्या लक्षात आले, म्हणूनच जे नागरिक आपला इन्कमटॅक्स प्रामाणिकपणे भरतात, त्यांचा प्रथमच गौरव केला जातो आहे. त्यांना धन्यवाद देणारे मेल पाठविण्यात येत आहेत, प्रमाणपत्र दिले जाते आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण जोपर्यंत कर पद्धती सोपी, सुटसुटीत होत नाही, न्याय्य होत नाही, तोपर्यंत हे रडगाणे संपणारे नाही. ते संपविण्यासाठी पाच प्रस्तावांची अर्थक्रांती हाच खरा मार्ग आहे. ज्यात ही भ्रष्ट करपद्धती आमूलाग्र बदलणे, काळ्या पैशाला फूस लावणा-या ५०च्या पुढील नोटा व्यवहारातून बाद करणे आणि सध्याची आलेली सूज कमी करून गरिबांना क्रयशक्ती देऊन अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक वेगाने पळेल, अशी व्यवस्था प्रस्थापित करणे, याला पर्याय नाही. सरकारसह सर्वाना या बदलाचे महत्त्व तर पटले आहे, पण त्या दिशेने जनतेचा आवाज उभा राहिलेला नाही. तो उभा राहावा, यासाठी येत्या ११, १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पुण्यात शनिवारवाडय़ासमोर अर्थक्रांतीसाठी विनम्र आग्रह उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात भाग घेणे, म्हणजे देशाच्या या रडगाण्यावर मार्ग शोधणे होय.

(लेखक अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि आíथक साक्षरता चळवळीचे कार्यकर्ते, व्याख्याते आहेत.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट