६ हजार ९१६ शिक्षकांच्या बोगस नियुक्ती बोगस करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
मुंबई- प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये ६ हजार ९१६ शिक्षकांच्या बोगस नियुक्ती बोगस करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यातील ४ हजार ११ शिक्षकांच्या नियुक्त्या सरकारने तात्काळ रद्द केल्या. या सर्व शिक्षकांचे पगार बंद करण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे.
२ मे २०१२ रोजी तत्कालीन सरकारने अनुदानित शाळेत भरती बंद केली होती. परंतु त्यानंतरही संस्थाचालकांनी भरती केली. ज्या शिक्षण अधिका-यांनी भरतीला मान्यता दिली, अशा ९९ शिक्षणाधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सरकारने आदेश देण्यात आले आहेत. या भरती करणा-या संस्थाचालकांवरही गुन्हा दाखल करण्याची शिक्षक संघटनांनी मागणी केली आहे.
संगणक प्रणाली सुरू केल्यानंतर शिक्षकांची नावे प्रणालीमध्ये अपलोड करण्याचे काम सुरू होते. शिक्षकांकडे कागदपत्रेच नसल्याचे समोर आले होते. मान्यता देत असताना अधिका-यांनी अफरातफर करत मान्यता दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तत्कालीन शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्या काळात नियमबाह्य मान्यता दिली.
[EPSB]
इस्रोचे प्रक्षेपण फेल
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रे) गुरूवारी संध्याकाळी करण्यात आलेल्या आयआरएनएसएस-१एच उपग्रहाचे प्रक्षेपण अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरले.
[/EPSB]