मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकावरील पुलावर शुक्रवार सकाळी पावणेअकराच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली.
मुंबई- मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकावरील पुलावर शुक्रवार सकाळी पावणेअकराच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. आतापयर्ंत मिळालेल्या माहितीनुसार, १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, परळ भागात सकाळी जोरदार पाऊस पडला. लोकलमधून उतरलेले प्रवासी मोठय़ा संख्येने पुलावर थांबले होते. त्याचवेळी दुस-या फलाटावरही लोकल आली. अचानक मोठी गर्दी जमल्याने ही चेंगराचेंगरीची घटना घडली.
एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकाला जोडणा-या पुलावर सकाळच्या वेळेत प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यात हा पूल खूपच अरुंद आहे. सकाळी पावणेअकराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता. लोकलमधून उतरलेले प्रवासी पावसापासून बचाव करण्यासाठी पुलावर थांबले होते. पाऊस आणि अरुंद पुल आणि प्रवाशांची गर्दी यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचवेळी दुस-या फलाटावरही लोकल आली. त्या लोकलमधून उतरलेले प्रवासीही पुलावर जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आणखी गोंधळ उडाला.
त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असे काही प्रवाशांनी सांगितले. २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी प्रसारमाध्यमांना दिली. १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे, असे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे. स्थानकांची नावे बदलण्यासाठी खर्च करतात, पूल ु सुविधांसाठी रेल्वेकडे पैसे नसतात, अशा शब्दांत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
[EPSB]
[/EPSB]