मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहिरातीवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहिरातीवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
या जाहिरातीत प्रकाशकाचे नावच नसल्याने त्यांच्यावर आचासंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पक्षाचे उपाध्यक्ष अशोक धात्रक यांनी केली आहे.
मुंबईतील बहुतेक सर्वच वृत्तपत्रांमध्ये भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेली कमळाची छोटी जाहिरात छापून येत आहे. निवडणूक आचारसंहितेनुसार प्रचार साहित्यावर प्रकाशकाचे नाव असणे अनिर्वाय आहे.