भाईंदरच्या उत्तन भागातील निसर्गरम्य समुद्र किना-याची अवस्था कच-यामुळे डंपिंग ग्राऊंडसारखी झाली आहे.
![संग्रहीत छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/03/Dumping.jpg)
भाईंदर- भाईंदरच्या उत्तन भागातील निसर्गरम्य समुद्र किना-याची अवस्था कच-यामुळे डंपिंग ग्राऊंडसारखी झाली आहे. त्यामुळे किना-यालगतच्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मासेमारीवरही या कच-याचा विपरित परिणाम होत आहे.
पालीबंदर ते भाटेबंदर हा पाच किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य समुद्र किनारा उत्तन गावाला लाभला आहे. या किना-यावर कचरा, प्लास्टिक पिशव्यांचे ढीग झाले आहेत. त्यामुळे उत्तन भागातील ग्रामस्थ व दर्या माता धर्मग्राम संस्थेने मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीत या घाणीमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची भीती वर्तवली आहे. हा किनारा स्वच्छ करण्यासाठी ठोस उपाय करण्याची मागणी ग्रामस्थांकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.