राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकांच्या स्वच्छतेचे काम पाहण्यासाठी आणि त्यात सुसूत्रता आणण्यासाठी स्वतंत्र निविदा काढून ते काम एकाच कंपनीला देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली.
मुंबई- राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकांच्या स्वच्छतेचे काम पाहण्यासाठी आणि त्यात सुसूत्रता आणण्यासाठी स्वतंत्र निविदा काढून ते काम एकाच कंपनीला देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली.
राज्यातील बहुतांश बस स्थानकांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. परिणामी प्रवासी संख्या वाढल्याने त्याचा सर्वाधिक फटका ‘एस. टी.’लाच बसत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
आमदार ख्वाजा बेग यांनी अर्धा तास चर्चेद्वारे यवतमाळ येथील आर्णी बस स्थानकाची दुरवस्था व त्यासोबतच राज्यातली सर्व बस स्थानकांचीही वाईट अवस्था झाली आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत परिवहनमंत्र्यांनी आर्णी बस स्थानक परिसरात काँक्रिटीकरण व इतर सोयीसाठी ४४ लाख रुपये मंजुरीची घोषणा केली.