ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना त्यांचा हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना त्यांचा हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या बंगल्याचा वाद अनेक वर्षापासून न्यायालयात सुरू असल्यामुळे ते पत्नी सायराबानो यांच्या घरी राहात होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलीपकुमार यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्तात बंगल्याचा ताबा घेतला.
दिलीपकुमार यांनी २००५ मध्ये त्यांचा पाली हिल येथील बंगला दुरुस्तीसाठी अर्षद वायदाना या विकासकाला दिला होता. तसा करारही त्यांनी विकासकासोबत केला होता. मात्र २००६ साली विकासकाने हा बंगला पाडण्यास सुरुवात केली. त्याबाबतची माहिती दिलीपकुमार यांना मिळाल्यानंतर त्यांनी विकासकाला काम थांबवण्यास सांगितले. मात्र त्यांना न जुमानता विकासकाने बंगल्यावर स्वत:चा हक्क दाखवत तो पाडण्याचे काम सुरूच ठेवले.
त्यामुळे विकासकाविरोधात दिलीपकुमार यांनी न्यायालयात धाव घेतली. अनेक वर्षे हा खटला सुरू होता. यादरम्यान वाढते वयोमान, आजारपण आणि न्यायालयात माराव्या लागणा-या खेटय़ांमुळे ते त्रस्त होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार या बंगल्याचा निकाल दिलीपकुमार यांच्या बाजूने दिला. त्यामुळे तब्बल १२ वर्षानंतर ते हक्काच्या घरात प्रवेश करणार आहेत.
[EPSB]
‘रागिणी एमएमएस रिटर्न’मध्ये आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणे रिया सेनला कठीण झाल्याने तिने असे इंटिमेट सीन्स द्यायला चक्क नकार दिला होता.
[/EPSB]