पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला आहे.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला आहे. येत्या १५ सप्टेंबपर्यंत तुमची योग्यता आणि उपयोगिता सिद्ध करा, जनहिताचे काय निर्णय घेतलेत ते सांगा, अशी तंबीच त्यांनी दिलीय. त्यामुळे फडणवीस स्वत:ला मोदी समजू लागल्याची कुजबूज मंत्रालयात ऐकू येतेय.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्येक मंत्र्याचा कामाचा अहवाल पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचे कळतेय. या प्रक्रियेची सुरुवात म्हणूनच की काय, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहका-यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. त्यावरील त्यांची उत्तरे तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात. तसेच, ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन र्वष पूर्ण होत आहेत.
त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो. गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेले काम श्रेष्ठ कसे ठरते? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेले नाही, असे मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना विचारले असल्याचे समजते आहे.
[EPSB]
[/EPSB]