भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यां मध्ये प्रचंड कार्यक्षमता असते. आपण मनापासून ठरविल्यास आपल्या नेमणुकीच्या कार्यक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता आपल्यात आहे.
मुंबई- भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यां मध्ये प्रचंड कार्यक्षमता असते. आपण मनापासून ठरविल्यास आपल्या नेमणुकीच्या कार्यक्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यानुसार सर्वसामान्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी काम करा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन निवड झालेल्या भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिका-यां ना दिला. महाराष्ट्र केडरमध्ये नवीन निवड झालेल्या २०१६ च्या बॅचच्या आयएएस अधिका-यां शी मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिका-यां कडून प्रशासकीय सेवेत येण्यामागच्या उद्देशाविषयी जाणून घेतले. नेमणुकीस असलेल्या जिल्ह्यातील समस्या, अधिका-यां नी तेथील परिस्थितीचे केलेले निरीक्षण आदींवर चर्चा केली. कुमार आशीर्वाद यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीची गरज व्यक्त केली. डॉ. इंदुराणी जाखड यांनी नागपूर येथील स्मार्ट सिटी प्रकल्प, जिल्ह्यातील सांसद ग्राम योजना, आदर्श गाव योजना आदी प्रकल्पांची उत्कृष्ट अंमलबजावणी होत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले.
[EPSB]
[/EPSB]