कुलभूषणला शिक्षा दिल्यास त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले.
नवी दिल्ली- हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
देशभरात ठिकठिकाणी पाकिस्तानचा तीव्र निषेध केला जात असून लोकसभेतही या मुद्यावरून गदरोळ पाहायला मिळाला. कुलभूषणला शिक्षा दिल्यास त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले आहे.
कुलभूषण जाधव हे देशाचे सुपुत्र आहेत. त्यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सुनियोजित कट आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. काहीही करू, ‘आउट ऑफ द वे’ जाऊन सरकार कुलभूषण यांना वाचवेल, अशी ग्वाही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली.
कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीची शिक्षेची अंमलबजावणी केल्यास द्विपक्षीय संबंधांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा सज्जड दमही स्वराज यांनी पाकिस्तानला दिला आहे.
कुलभूषण यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असून त्यांना लढा देण्यासाठी लागेल ती कायदेशीर मदत केंद्र सरकार करेल, अशी हमी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली.
Kulbhushan Jadhav sentencing: India warns Pakistan of severe consequences
Read @ANI_news storyhttps://t.co/9qhVP2AlOq pic.twitter.com/l6XHsnthyO
— ANI Digital (@ani_digital) April 11, 2017
आपली बाजू स्पष्ट आहे. कुलभूषण जाधव यांनी कुठलेही गैर कृत्य केल्याचे पुरावे नाहीत, असे स्वराज म्हणाल्या. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात लढताना कुलभूषण जाधव यांना भारतातले उत्तम वकील मिळवून दिले जातीलच, मात्र त्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी भारत सरकार सर्व प्रकारे प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज यांनी ही माहिती दिली.
हे प्रकरण भारत सरकार उचलून धरेल, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या. यामुळे हा मुद्दा भारत सरकार संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याचे संकेत मिळत आहेत.
Uttar Pradesh: Protest against Pakistan and death sentence given to #KulbhushanJadhav, outside Islamic Centre of India in Lucknow pic.twitter.com/0oG5IzTgDn
— ANI UP (@ANINewsUP) April 11, 2017
कुलभूषण यांच्यासोबत सरकार पूर्णपणे न्याय करेल, असे आश्वासन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. तसेच त्यांच्या सुटकेसाठी काहीही करण्यास सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून ठिकठिकाणी शिक्षेविरोधात निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तानचा धिक्कार केला जात आहे. या जनक्षोभाची दखल घेऊन काँग्रेसने कुलभूषण यांच्या शिक्षेचा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. त्यावर, राजनाथ सिंह आणि सुषमा स्वराज यांनी निवेदन केले.
लोकसभेत आज कुलभूषण जाधव यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता, त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला काँग्रेसने दिला. त्यानंतर विविध पक्षांच्या खासदारांनी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर स्वतःची मते मांडली.
[EPSB]
कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा »
हेरगिरीच्या आरोपाखाली भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
[/EPSB]
कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवा- ओवेसी
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावे, असे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
कोण आहेत कुलभूषण?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रिसर्च अँड अॅनलिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना १२ मे २०१४ रोजी पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीचे असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलीस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आले आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
Will go out of the way to save him, wo poore Hindustan ka beta hai:Sushma Swaraj in Rajya Sabha on Kulbhushan Jadhav pic.twitter.com/2h9ICrtqJm
— ANI (@ANI_news) April 11, 2017
Protest near Pakistan High Commission in New Delhi against death sentence given to #KulbhushanJadhav pic.twitter.com/oa9w0iJJ5i
— ANI (@ANI_news) April 11, 2017
Congress raises the issue of death sentence to Kulbhushan Jadhav by Pakistan, in Lok Sabha pic.twitter.com/Xx1BwbzimK
— ANI (@ANI_news) April 11, 2017
Maharashtra: Protest against Pakistan in Nagpur over death sentence to Kulbhushan Jadhav. pic.twitter.com/EzXyRkmrfR
— ANI (@ANI_news) April 11, 2017