छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत आणि हिंदूंचे राजकारण करीत भाजपा-शिवसेना सतेते आले आहेत. पण हिंदूंच्या सणांबाबत त्यांना काहीही पडलेले नाही. सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने ४५ अध्यादेश काढले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत आणि हिंदूंचे राजकारण करीत भाजपा-शिवसेना सतेते आले आहेत. पण हिंदूंच्या सणांबाबत त्यांना काहीही पडलेले नाही. सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने ४५ अध्यादेश काढले आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानंतरही बाळगोपाळांच्या वयाबाबत सरकार निर्णय करू शकते. त्याचे उत्तर सरकारकडेच आहे. हिंदूंचा एवढा कळवळा असेल तर राज्य सरकार नीट परीक्षेप्रमाणे याबाबतही अध्यादेश का काढत नाही? असा सवाल करीत सध्या शिवसेना-भाजपाकडून दहीहंडीबाबत सुरू असलेला वाद केवळ नाटकबाजी असल्याची सणसणीत टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांना सामना दैनिकातून अग्रलेख लिहायला सुचते पण सरकारमधील आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत का निर्णय करायला सांगत नाहीत? तेव्हा मराठी लोकांबाबत कळवळा असेल तर मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जेवायला बोलवा.
फोन करा आणि अध्यादेश काढा. एरव्हीही हे ते सगळं करीतच असतात, असा चिमटाही त्यांनी यावेळी ठाकरे यांना काढला.