महात्मा गांधी जयंती दिनी राज्यात सुरू करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या मिशन अंत्योदय, ग्रामसमृद्धी व स्वच्छता अभियानाबरोबरच, नाविन्यपूर्ण मुख स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले असून ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थाची मुख तपासणी करण्यात येत आहे.
ठाणे- महात्मा गांधी जयंती दिनी राज्यात सुरू करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या मिशन अंत्योदय, ग्रामसमृद्धी व स्वच्छता अभियानाबरोबरच, नाविन्यपूर्ण मुख स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले असून ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थाची मुख तपासणी करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी आणि कवाड ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांंची दंत तपासणी करण्यात आली. गणेशपुरी येथे ३१६ आणि कवाड येथे २२६ अशा एकूण ५४२ विद्यार्थ्यांंची मुख तपासणी करण्यात आली. तसेच चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख स्वच्छतेबद्दल माहिती देण्यात आली.
पिसे ता. भिवंडी येथे एकूण २१४ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनगाव ता. भिवंडी जि. ठाणे येथे एकूण १५६ विद्यार्थी यांची दंत तपासणी करण्यात आली. यावेळी साधारण ३७० विद्यार्थ्यांची दंत तपासणी झाली. तर भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत राहनाळ आणि ग्रामपंचायत वडूनवघर येथे प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांंची दंत तपासणी करण्यात आली.
[EPSB]
भरत भगत यांची सामाजिक बांधिलकी
[/EPSB]