एक हजार महात्मा गांधी आणि १ लाख मोदी रस्त्यांवर उतरले तरी देश स्वच्छ करू शकणार नाहीत.
नवी दिल्ली- एक हजार महात्मा गांधी आणि १ लाख मोदी रस्त्यांवर उतरले तरी देश स्वच्छ करू शकणार नाहीत. परंतु देशातील सव्वाशे कोटी जनता रस्त्यावर उतरली तर देश स्वच्छ करण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकते’असा आशावाद पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीला व्यक्त केला. स्वच्छता अभियानाला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले. देश स्वच्छ करायचा असेल तर देशवासियांनी सहभागी व्हायला हवे. जर एक हजार महात्मा गांधी आले. एक लाख नरेंद्र मोदी आले. सर्व मुख्यमंत्री एकत्र आले. सर्व सरकार एकत्र आली तरी स्वच्छतेचे स्वप्ने खरे होऊ शकत नाही. परंतु, जर सव्वाशे कोटी देशवासीय एकत्र आले तर पाहता पाहात हे स्वप्न साकार होऊ शकते, असे मोदी म्हणाले. मला माहिती आहे की, मी हे म्हटल्यानंतर माझ्यावर टीका होऊ शकते. परंतु जे खरे आहे ते देशवासियांसमोर मांडणे गरजेचे आहे, असेही मोदी म्हणाले.
मोदी यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. मोदींना शिव्या देण्यासाठी विरोधकांकडे अनेक विषय आहेत. परंतु समाजाला जागरूक करण्यासाठी राजकारण व्हायला नको. समाजातील बदलासाठीच्या विषयाकडे गंमत म्हणून पाहू नका, असे आवाहनही मोदी यांनी विरोधकांना केले.
[EPSB]
[/EPSB]