पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील साठ ते सत्तर कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. पगारवाढीची मागणी करणा-यां कामगारांवर चितळे बंधूंनी ही कारवाई केली आहे.
पुणे- पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील साठ ते सत्तर कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. पगारवाढीची मागणी करणा-यां कामगारांवर चितळे बंधूंनी ही कारवाई केली आहे. चितळे बंधूंच्या गुलटेकडी भागातील कामगार गेले काही दिवस पगारवाढीची मागणी करत आहेत. मात्र चितळेंचे व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्ष सुरू आहे. कामगारांनी कामगार संघटना स्थापन करुन कामागार आयुक्तालयात याबात तक्रार देखील दिली. मात्र चितळेंकडून कोणीही कामगार आयुक्तांसमोरच्या सुनावणीला हजर राहिले नाही आणि त्यानंतर कामगारांना काम देण्यासही बंद करण्यात आले.
चितळेंच्या कारखान्यात १० वर्षे काम करणा-यां कामगारांना ९ हजारांहून कमी पगार दिला जातो, तर ३६ वर्षे काम करणा-यां कामगाराला १५ हजार रुपये दिले जातात, असे कामगारांचे म्हणणे आहे. या कामगारांना कामावरून कमी केल्यानंतर चितळे तात्पुरत्या कामगारांकडून मिठाई बनवून घेत आहेत. मात्र त्या पदार्थाच्या चवीमधे आणि दर्जामधे फरक पडल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
[EPSB]
[/EPSB]