पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी (१४ सप्टेंबर) येथे देशातील मुंबई-अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनची पायाभरणी केली जाणार आहे.
अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी (१४ सप्टेंबर) येथे देशातील मुंबई-अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनची पायाभरणी केली जाणार आहे. पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी हे एक आश्वासन होते. जपान सरकारच्या मदतीने ते आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. ही बुलेट ट्रेन पाच ते सहा वर्षांत म्हणजे २०२३ मध्ये पूर्ण होऊन धावू लागेल, असा अंदाज आहे.
या प्रकल्पाला १९ अब्ज डॉलर खर्च येणार आहे. त्यापैकी ८५ टक्के रक्कम जपान दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या रूपाने देणार आहे. जगात वेगवान रेल्वेगाडय़ांची निर्मिती करण्यात जपान अग्रेसर आहे. जपानची शिंकानसेन ही रेल्वे जगातील वेगवान गाड्यांपैकी एक मानली जाते. अहमदाबाद ते मुंबई रेल्वेला सध्या आठ तासांचा वेळ लागतो. बुलेट ट्रेनने हे अंतर तीन ते साडेतीन तासांत कापले जाईल, असा अंदाज आहे. या मार्गावर धावणा?्या गाडीची क्षमता ७५० प्रवाशांची असेल. भारतातील रेल्वेमागार्चे जाळे अंतराच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे मानले जाते.
देशातील बहुसंख्य प्रवाशांसाठी रेल्वे हेच स्वस्त प्रवासाचे माध्यम आहे. त्यामुळेच भारतात रोज दोन कोटी २० लाख प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र, भारतातील रेल्वेगाड्यांचा वेग जागतिक स्पर्धेच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारतीय एक्स्प्रेस गाड्या जास्तीत जास्त ताशी शंभर ते सव्वाशेकिलोमीटर वेगाने धावतात. त्या तुलनेत जपान, चीन, फ्रान्स आदी देशांतील बुलेट ट्रेनचा वेग ताशी तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर एवढा जास्त आहे. त्यामुळेच भारतात बुलेट ट्रेन असावी, असे मोदी यांचे स्वप्न आहे.
[EPSB]
[/EPSB]