केंद्रीय अर्थसंकल्प ठरल्याप्रमाणे एक फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे, केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्प ठरल्याप्रमाणे एक फेब्रुवारीलाच मांडला जाणार आहे, केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केले आहे. तसेच या वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्पाचा देखील यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान ८ मार्चला होणार आहे. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करून सरकार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता.
मात्र, राष्ट्रपती मुखर्जी यांनी ठरल्या तारखेलाच अर्थसंकल्प मांडण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपासून अधिवेशनला सुरूवात होणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सु रूवात होणार आहे.