‘कायदे तोडणे आणि त्यांचा अवमान करणे हे आता आपल्या संस्कृतीत आणि रक्तात भिनले आहे,’ अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी खंत व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली- ‘कायदे तोडणे आणि त्यांचा अवमान करणे हे आता आपल्या संस्कृतीत आणि रक्तात भिनले आहे,’ अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी खंत व्यक्त केली आहे.
दिल्लीतल्या लाजपतनगरमधील एका संस्थेचा प्रमुख आपल्या घराच्या इमारतीचा वापर हा व्यावसायिक कारणांसाठी करीत होता. याप्रकरणी सुनावणी दरम्यान जस्टिस खेहर यांनी आपले मत मांडले आहे.
खेहर म्हणाले की, जर तुम्हाला आपला देश विकसित देश बनवायचा असेल तर कायद्याचे पालन हे करावेच लागेल, कायदे तोडणे आणि त्यांचा अवमान करणा-यांना आता कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्याला शिक्षाही होणारच, अशा शब्दात त्यांनी कायदे तोडणा-यांना खडेबोल सुनावले आहेत.
खेहर यांची ही टिपण्णी विजय मल्ल्याकडून न्यायालयाच्या आदेशांना पायदळी तुडवल्याच्या प्रकरणांशीही जोडता येणारी आहे. मल्याने न्यायालयाच्या आदेशानंतरही न्यायालयात हजर राहण्याबाबत वारंवार नकार दिला आहे. भारतातील बॅंकांना तब्बल नऊ हजार कोटींना चुना लावून मल्ल्या लंडनमध्ये पळून गेला आहे.