भाजपच्या खोटय़ा प्रचाराला नांदेडमधील जनतेने धुडकावले आहे. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.
मुंबई- भाजपच्या खोटय़ा प्रचाराला नांदेडमधील जनतेने धुडकावले आहे. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. नांदेड महापालिकेमधील मोठय़ा विजयानंतर त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला नांदेडमधील जनतेने चोख उत्तर दिले आहे. त्यांनी ५ ते ६ नगरसेवक फोडले. मात्र जे पक्ष बदलून भाजपमध्ये गेले, ते सर्वजण पराभूत झाले आहेत, असे चव्हाण म्हणाले. शिवसेनेचे आमदार भाजपचे उमेदवार ठरवतात. शिवसेनेचे आमदार आणि एक निवृत्त सनदी अधिकारी भाजपची निवडणूक धुरा सांभाळतात.
भाजपने जुने कार्यकर्ते आणि आरएसएस कार्यकर्ते दुर्लक्षित केले, असा आरोप चव्हाण यांनी केला. खोटय़ा आश्वासनांना नांदेडची जनता बळी पडली नाही. शिवाय, खालच्या पातळीवरील प्रचार करणाऱ्या नेत्यांना जनतेने त्यांची दाखवून दिली, असे अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी, वाईट काळात काँग्रेसला नांदेडकरांनी साथ दिली, असे सांगत त्यांनी नांदेडकरांचे आभार मानले.
[EPSB]
[/EPSB]