नवी दिल्लीनेनवी दिल्ली रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली- भाजपने इतिहासकार रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यां गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध जोडल्याप्रकरणी ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येमागे आरएसएस आणि भाजपचा थेट संबंध नसला तरीही अशा हत्या व्हाव्यात, समाजात तेढ निर्माण व्हावी, सामाजिक कार्यकर्त्यांंविरोधात भावना भडकवल्या जाव्यात, असे वातावरण निर्माण करण्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हातभार लावला असल्याचे रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे.
अशा हल्लेखोरांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असते. सामाजिक कार्यकर्त्यांंच्या विरोधात या लोकांची माथी भडकवण्याचे कामही असेच नेते करत असतात असेही गुहा यांनी म्हटले आहे. एका दैनिकात लिहिलेल्या लेखात रामचंद्र गुहा यांनी हे सगळे आरोप केले होते. ज्यानंतर कर्नाटकच्या भाजयुमोने रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या संदर्भातले ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.
सध्याच्या घडीला देशात असलेले वातावरण हे आणीबाणीपेक्षा बिकट आहे. या वातावरणात समाजासाठी झटणारे लोक सुरक्षित नाहीत असाही उल्लेख रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या लेखात केला होता. मात्र रामचंद्र गुहा यांनी हे आरोप केलेच कसे? या आरोपांना अर्थ नाही असे म्हणत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांंनी रामचंद्र गुहा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील राहत्या घरी हत्या करण्यात आली. त्यांच्यावर हल्लेखोराने सात गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला.
[EPSB]
व्ही. के. शशिकला यांची अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी
[/EPSB]