क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सामाजिक आणि आर्थिक समतेच्या चळवळीचा पाया भारतात रचला.
मुंबई- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सामाजिक आणि आर्थिक समतेच्या चळवळीचा पाया भारतात रचला. त्यांना ‘भारत रत्न’ किताब मिळावा यासाठी आपण सर्वस्वपणाला लावून प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेयांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतात सर्व प्रथम स्त्री शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केला. अस्पृश्यांसाठी स्वत:चा पाण्याचा हौद खुला केला. विधवा पूनर्विवाहाद्वारे स्त्रियांना समतेचा हक्क मिळवून देणारे ते आद्य समाजसुधारक होते. त्यांचे कार्य ऐतिहासिक युगप्रवर्तक आणि क्रांतिकारी आहे.
महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कायार्चा गौरव झाला पाहिजे ही मागणी पुढे येत असून त्यास आपल्या रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असे प्रतिपादन करून फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असा निर्धार आठवले यांनी केला .