ऐतिहासिक ईडन गार्डन्सवरील गुरुवारचा विजय हा भारताचा तिन्ही क्रिकेट प्रकारांतील सलग ११वा विजय ठरला.
मुंबई- ऐतिहासिक ईडन गार्डन्सवरील गुरुवारचा विजय हा भारताचा तिन्ही क्रिकेट प्रकारांतील सलग ११वा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी २-० अशी आघाडी घेतली आहे. या आघाडीसह विराट कोहली आणि सहका-यांच्या आवाक्यात सलग तिसरा मालिका विजय आहे.
जगज्जेता ऑस्ट्रेलिया संघ भारताला चुरस देईल, असे वाटत होते. मात्र चेन्नई पाठोपाठ कोलकात्यातही पराभव पाहावा लागला. यजमानांचा हा सलग आठवा वनडे विजय आहे. या विजयासह तिन्ही प्रकारांतील सलग विजयांची संख्या ११वर गेली आहे.
श्रीलंका दौ-यातील कसोटी ३-०(३) आणि वनडे मालिका ५-०(५) तसेच एकमेव टी-२० लढतीतील विजयानंतर भारताने मागे वळून पाहिलेले नाही. सलग विजयामुळे २-० अशी आघाडी घेत कोहली आणि कंपनीने सलग तिस-या मालिका विजयासाठी दावेदारी पेश केली आहे. यंदाच्या हंगामात वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेनंतर ऑस्ट्रेलियाला हरवण्याची दुर्मीळ संधी यजमानांना चालून आली आहे.
उंचावलेली सांघिक कामगिरी पाहता भारताला मालिका विजय शक्य आहे. मात्र स्टीव्हन स्मिथ आणि सहका-यांवर वर्चस्व राखताना यजमान सलग दुस-या ‘व्हाईटवॉश’ची नोंद करतात का, याची उत्सुकता आहे.
[EPSB]
[/EPSB]