मतदान यंत्रातील घोटाळ्याची देशभर चर्चा होत असताना, आता या वादात आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानीही उडी घेतली आहे.
नवी दिल्ली- मतदान यंत्रातील घोटाळ्याची देशभर चर्चा होत असताना, आता या वादात आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानीही उडी घेतली आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी अकाली दल आणि भाजपाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत, मतदान यंत्रात फेरफार करून, आपची मते स्वत:च्या पारडयात टाकल्याचा आरोप केजरीवाल यानी केला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत ७७ जागांसह काँग्रेसला बहुमत मिळाले, तर अकाली दल आणि भाजपा युतीला दुसरे स्थान मिळाले आहे.
सत्ता स्थापनेची स्वप्ने पहात असलेल्या आपला या निकालानी मोठा धक्का बसला. मात्र, आपचे नेते अद्यापहा कौल स्वीकारायला तयार नसल्याचेच चित्र केजरीवाल यांच्या विधानाने अधोरेखित झाले आहे.
केजरीवाल म्हणाले की, हा कसला निकाल आहे? पंजाबच्या अनेक भागात आपचे जितके कार्यकर्ते काम करत आहेत,तितकी मतेही त्या भागात आमच्या वाट्याला आलेली नाहीत. त्यामुळेसत्ताधारी पक्षानी मतदान यंत्रामध्ये गडबड केल्याच्या आमच्या दाव्याला बळकटीच मिळत आहे. त्यानी आमची किमान २० ते २५ टक्के मते पळवली आहेत, असे आमचे म्हणणे आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
अनेक देशानी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरबंदी घातल्याकडे लक्ष वेधून केजरीवाल पुढे म्हणाले की, खुद्द सर्वोच्च न्यायालयाने या यंत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. असे असताना, परत अशी सदोष यंत्रे वापरणे कितपत हितकारक आहे, याचा केंद्र सरकारने विचार करावा. सर्व एक्झिट पोल खरे असतील तर, त्यानुसार आपला जितक्या जागा पंजाबात मिळायला पाहिजे होत्या, तितक्या त्यामिळालेल्यानाहीत, हे वास्तव आहे, याकडे केजरीवाल यानी लक्ष वेधले आहे.