दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अपेक्षाभंग केल्याची खंत ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
मुंबई- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अपेक्षाभंग केल्याची खंत ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांचे काही मंत्री घोटाळ्यांमध्ये अडकत आहेत काही तुरुंगात जात आहेत, हे पाहून दुःख झाल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.
केजरीवाल मंत्रिमंडळातले मंत्री संदीप कुमार यांची आक्षेपार्ह सीडी पुढे आल्यानंतर आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर अण्णांनी प्रतिक्रिया दिली.
‘मला अरविंदकडून ब-याच अपेक्षा होत्या, तो भारतीय राजकारणात वेगळे उदाहरण प्रस्थापित करेल, असे वाटले होते. पण त्या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्यात’, असे अण्णा म्हणाले. पुढे बोलतांना त्यांना सांगितले की, ‘माझ्यासोबत असतांना केजरीवाल यांनी ‘ग्राम स्वराज’वर एक पुस्तक लिहिले होते, पण याला ‘ग्राम स्वराज’ म्हणावे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.