आंबेडकर प्रकरणी वाद नको, या प्रकरणी जे काही चालले आहे ते थांबवावे, असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी विधान परिषदेत केले.
मुंबई- आंबेडकर प्रकरणी वाद नको, त्या वास्तूचे पावित्र्य राहिले पाहिजे. त्यासाठी काही नियम बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करावी, या प्रकरणी जे काही चालले आहे ते थांबवावे, असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी विधान परिषदेत केले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आंबेडकर भवन पुनर्बाधणी करण्यासाठी सरकारकडून खर्च केला जाईल. यासाठी प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी योग्य आराखडा दिला तर त्यासाठी मध्यस्थी करून मार्ग काढला जाईल, असे स्पष्ट आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
विधान परिषदेत आंबेडकर भवन प्रकरणी उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान विषय वाढत असल्याचे लक्षात आल्याने राणे यांनी आंबेडकर भवन प्रकरणी वास्तू पुन्हा उभी राहण्यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यासाठी समेट घडवून आणावा व ट्रस्टी आणि आंबेडकर बंधूंची चर्चा घडवून आणल्यास त्यातून मार्ग निघेल. हा प्रश्न राज्याच्या दृष्टीने हिताचा असल्याचेही राणे सांगितले. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून बुद्धभूषण प्रेसच्या पुनर्बाधणीसाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
जयदेव गायकवाड, प्रा. जनार्दन चांदुरकर, प्रकाश गजभिये, कपिल पाटील आदींनी आंबेडकर भवन पाडलेल्या लोकांवर कारवाई करावी आणि यासाठी जबाबदार असलेल्या माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल केला होता. रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई त्यानंतर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी करण्यासाठी पोलिसांचा अहवाल आल्यानंतर तो राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे सांगितले.
दरम्यान, रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांचाच पाठिंबा आहे काय, असा गैरसमज निर्माण झाला आहे. राज्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असल्याची बाब प्रा. चांदुरकर यांनी निदर्शनास आणून दिली तर आयुक्तपदावर असताना त्यांनी सरकारची फसवणूक केली असून गायकवाड यांना तत्काळ अटक करण्याची मागणीही आमदार कपिल पाटील आणि इतर सदस्यांनी केली. तर प्रकाश गजभिये यांनी यामुळे निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण मिटवावे अशी विनंती केली.