कोकणात गणपतीसाठी जाणा-या कोकणवासीयांना कमी तिकीट दरात सुरक्षित प्रवास करता येण्यासाठी ‘स्वाभिमान’ संघटनेतर्फे खास १०० रुपयांत मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बससेवा सुरू करण्यात येत आहे.
मुंबई- कोकणात गणपतीसाठी जाणा-या कोकणवासीयांना कमी तिकीट दरात सुरक्षित प्रवास करता येण्यासाठी ‘स्वाभिमान’ संघटनेतर्फे खास १०० रुपयांत मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बससेवा सुरू करण्यात येत आहे. त्याचा लाभ मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांना होणार आहे.
येत्या २६, २७ आणि २८ ऑगस्ट, २०१६ असे तीन दिवस या बस तिकिटांसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. केवळ शंभर रुपये भरून चाकरमान्यांना स्वाभिमान संघटनेच्या वांद्रे पश्चिम येथील मुख्य कार्यालयात नोंदणी करता येणार आहे.
या बसेस १,२ आणि ३ सप्टेंबर रोजी मुंबईहून सुटणार आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ कोकणवासीयांनी घ्यावा, असे आपुलकीचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.