दहीहंडी उत्सवात मानवी मनो-यांच्या निर्बंधांसंबंधातील पुढील सुनावणी दोन ऑगस्टला होणार आहे.
नवी दिल्ली- दहीहंडी उत्सवात मानवी मनो-याच्या निर्बंधांसंबंधातील पुढील सुनावणी दोन ऑगस्टला होणार आहे.
दहिहंडी उत्सवात गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत, त्याचे लेखी स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मागवले आहे. येत्या दोन ऑगस्टला मानवी मनो-यांच्या निर्बंधांसंबधातील पुढील सुनावणी होणार आहे.
दहिहंडी उत्सवात २० फुटांपेक्षा जास्त उंच मनोरे लावता येणार नाहीत तसेच १८ वर्षाखालील मुलांना या मनो-यात सहभाग घेता येणार नाही, असे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने घातले आहेत. याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारने गोविंदाच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाय केले आहेत, त्याचा लेखी अहवाल सादर करा, त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल, असे न्यायालयाने सांगितले.