जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमास पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीझ सईद याचा हात होता, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयु) दहशतवादी अफझल गुरु याच्या ‘स्मरणार्थ‘ घेण्यात आलेल्या कार्यक्रमास पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीझ सईद याचा हात होता, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
‘देशातील प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये अशी घटना घडते ही दुर्दैवी बाब असून यामध्ये लष्कर ए तैयबाचा हात आहे, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाचे गांर्भिय लक्षात घेऊन कोणीही राजकारण करू नये,’ असे आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले आहे.
‘भारतविरोधी घोषणा दिल्या जात असताना सर्व देशाने त्याविरोधात एकत्र येणे आवश्यक आहे. देशविरोधी कारवायांना माफी मिळणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले.