१२ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पूर्ण होणार असल्याने तोपर्यंत विविध वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात येणा-या मतदानोत्तर चाचण्यांवर निवडणूक आयोगाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली -१२ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पूर्ण होणार असल्याने तोपर्यंत विविध वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात येणा-या मतदानोत्तर चाचण्यांवर निवडणूक आयोगाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
सर्वेक्षणावर आधी १६ तारखेपर्यंत बंदी घालण्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये बदल करत ही बंदी १२ तारखेपर्यंत करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाचे संचालक धिरेंद्र ओझा यांनी स्पष्ट केले. याआधी सव्र्हे १६ तारखेपूर्वी दाखवले जाऊ नयेत, असे निवडणूक आयुक्त एच. एस ब्रह्मा यांनी सांगितले होते.
काही ठिकाणी पुनर्निवडणूक घ्यायची असल्याचे ब्रह्मा म्हणाले होते. संवादाच्या अभावामुळे चुकीची तारीख दिली गेल्याचे स्पष्टीकरण ब्रह्मा यांनी दिले. ब्रह्मा यांच्याकडून चुकून १६ तारीख दिली गेल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.