सध्या धर्मातराचे पेव फुटले आहे. याच्या मागे काही तात्त्विक बैठक असते असे नाही, तर ज्या धर्मात राहून आपल्या पोटाची खळगी भरता येत नाही तेव्हा दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न होतो. यालाच धर्मातर म्हटले जाते.
सध्या हिंदूंची धर्मातरे होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. स्वधर्म सोडून दुस-या धर्मात जाणे, वशीकरणाच्या जाळ्यात अडकणे यात सक्ती होत असावी असा हिंदू संघटनांचा संशय असून, खरी कारणे मात्र वेगळी आहेत. पिंज-यात वाघ अडकावा म्हणून तर पिंज-यात बकरी अथवा मांस ठेवले जाते. प्रेलोभने, मदतीचे गाजर वंचितांसमोर ठेवले तर तो पोटाची खळगी भरण्यासाठी, फाटकी चिरगुटे बदलण्यासाठी मदतगाराचा हात धरू लागला तर दोष कुणाचा? स्वधर्म वाढविण्यासाठी, धर्माची ओढ लावण्यासाठी काही धर्मप्रचारक वस्त्यांवस्त्यांत जाऊन स्वधर्माचा प्रचार करताहेत. त्यासाठी, गरीब, अगतिकांचा शोध घेतला जात आहे. हिंदू धर्मातील प्रचारक हे कधी करणार? इतर धर्मप्रचारक स्वत:ला प्रचारकार्यात वाहून घेतात. ते हे काम म्हणजे आपले कर्तव्य समजतात. यामागचे कारण असे की, त्यांचे धर्म छोटे असतात. त्यांना आपला धर्म वाढवायचा असतो. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
मात्र हिंदू धर्म हा महासागरासारखा विशाल आहे. त्या महासागरातील एक थेंब गेला तरी काही कमी होत नाही, असा काही जण समज करून घेत असतील तर तो चुकीचा आहे. हिंदूचे साधू-संत आणि मंदिरातले पुजारी हेच काम का करीत नाहीत? टाळ कुटून भजने, प्रवचने, कीर्तने, होमहवन, कुंभमेळे, रथयात्रा, सत्यनारायणाच्या महापूजा आदी करतात. राममंदिर बांधून मथुरा काशी मिळविण्याची हेच लोक भाषा करतात. अनेकजण वारी रूपाने नाचत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन दिडय़ांतून पंढरीच्या पांडुरंगाला विनवणी करतात. भाविक उदार अंत:करणे जत्रा-यात्रा करून दानपेटय़ांतून भरभरून दान टाकतात. देवाच्या दानपेटय़ांत करोडे रुपये आणि सोने, चांदी, हिरे यांचे दान देतात. धर्म प्रचारासाठी, धर्मातील गरीब-वंचिताना सावरण्यासाठी कोण व कधी धावणार?
या देशात सध्या हिंदू गरीब कुटुंबे भरपूर आहेत. कुपोषण, उपासमारीमुळे मरणा-यांना गरिबीला कंटाळून आत्महत्या करणा-यांना, पोटासाठी मुलांबाळाना विकणा-यांना सावरायला हवे आणि आवरायलाही हवे. उपासमारीला कंटाळलेल्यांना जणू त्यांच्या अस्तित्वाची भूल पडली असून जो कोणी मदत करील तो आपलासा वाटतो आहे. जातीसाठी माती खावी, परंतु परधर्म स्वीकारू नये असे म्हणणे सोपे असते. परंतु उपाशी पोटांना लाखोलींची पर्वा नसते. कंटाळलेल्या जीवांना जात आणि धर्म दिसत नाही. परिस्थिती माणसाला गुलाम बनविते. खाटिक जनावरे कापतो आणि मच्छीमार मासे पकडतो तेव्हा तो पापपुण्याची पर्वा करीत नाही. त्याला विवंचना असते भुकेची. याच अगतिकतेचा फायदा इचर धर्मीय उठवताहेत. सक्तीने धर्मातर होत असतील तर खोडसाळपणा करणा-यांना जाब विचारायलाच हवा. मात्र प्रलोभनांना भुलून जर धर्मातर होत असतील तर मात्र खोलात जाऊन, तपास करून आत्मपरीक्षण करायला हवे. भुकेला कंटाळून धर्मातर होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी.
धर्मातर केले तर काय फरक पडणार आहे, असे म्हणून गप्प न बसता परिस्थितीला कंटाळून जाणारे शोधून त्यांना धर्मातरापासून थांबवायला हवे. अनेक हिंदू संघटनांना एकत्र आणून काम करायला हवे. देवांचा महिमा सांगताना हिंदूंच्या मनोमीलनाची आणि एकीकरणाची जबाबदारी हिंदूंच्या संघटनांनी घ्यायला हवी. देवाच्या मंदिराची देखभाल करताना देहमंदिरांचीही देखभाल ठेवायला हवी. जेव्हा-जेव्हा धर्मावर संकट येईल, तेव्हा-तेव्हा मी धाव (युगायुगात) घेईन असे भगवंताने म्हटल्याचे आपण वाचतो, परंतु भगवंताच्या धावेची वाट बघण्यापेक्षा त्या भगवंताचे आपण भक्त सशक्त आहोत. देशावर आलेले अतिरेक्यांचे संकट आपण एकजुटीने परतवू शकतो. ‘जरी हजार अमुच्या जाती। संकटामध्ये विव्हळती। परचक्र येतसे जेव्हा। चौघांची एकच जीव्हा.., उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू।’’ या समरगीताचे बोल आठवा. परधर्माला, परदेशांना, परशत्रूला आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहू देऊ नका. जाती-धर्म आणि प्रांतभेद विसरून भारतभूमीत राहा. मातृभूमीचे गुणगाण गा, असे आवाहन करूनही अनेक जण स्वत:च्याच धर्माचे गोडवे गाताना दिसतात.
एक देश एक कायदा (समान नागरी कायदा) का होत नाही? देशात तिरंगा एकच ध्वज मोठा न मानता वेगळ्या ध्वजाची मागणी तरी का व्हावी? हिंदुस्थानात बहुसंख्य राहतात. नव्हे, हे हिंदू राष्ट्र आहे हे माहीत असूनही हिंदूंच्या भावना का दुखविल्या जातात? उपदेशाचे डोस फक्त हिंदूंना पाजले जातात. हिंदूंमधील स्वकीय सुद्धा आता पुराणकाळावर टीकात्मक नाटय़ निर्मिती करून पोटाची खळगी भरण्याचा धंदा करताहेत. देवदेवतांची टिंगल चालविली जात आहे. देव करी लव्ह, वस्त्रहरण, यदाकदाचित आदी नाटके सादर करून हिंदूंच्या भावना दुखावताहेत. वस्तूंच्या खोक्यांवर, तांदळाच्या गोण्यांवर आणि आता विध्वंसक फटाक्यांवरही हिंदू देवदेवतांचे फोटो छापले जात आहेत. मात्र एवढे करूनही ही मंडळी मोकाट कशी सुटतात? ब-या-वाईट चालीरीती प्रत्येकाच्या धर्मात असतात, पण अंधश्रद्धेचे खापर मात्र हिंदूंवर फोडले जाते. समाजात खोलवर रुतलेल्या अंधश्रद्धांचे निर्मुलन व्हायला हवे. परंतु अंधश्रद्धा गाडताना ख-या श्रद्धेचा मान राखायलाच हवा. धर्मरक्षण, हिंदूंची धर्मातरे हा विषय हसण्यावर न घालविता याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. हिंदू राष्ट्रासाठी येवढे करायला हवेच.
भ्रमणध्वनी : ९८३३५७१६७३