अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे.
अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे. या सर्व समस्यांचा सामना अगदी झोपडीपासून गगनचुंबी इमारतींपर्यंत कुठेही राहणा-या मुंबईकरांना करावा लागतोच. त्याविषयी कुरबुर करणे, आपसात चर्चा करून महापालिका किंवा संबंधित संस्थेला दूषणे देणे किंवा फार तर तक्रार नोंदवणे यापलीकडे काही केले जात नाही.
या तक्रारींची दखल घेतली जाईलच, याचीही शाश्वती नसते. त्यामुळेच ‘प्रहार’ने वाचकांसाठी हे खास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या समस्या तुम्ही इथे मांडल्यास आणि संबंधित छायाचित्रेही सोबत जोडल्यास त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
संपर्क : प्रहार कार्यालय, इंडियाबुल्स वन सेंटर, ज्युपिटर मिल्स कंपाउंड, फितवाला रोड, लोअर परळ, मुंबई- १३, फॅक्स : ०२२-४०९६९९००
ई-मेल : prahaar.complaint@prahaar.co.in
अंधेरी पूर्वेकडील चकाला, देऊळवाडी परिसरात सुमारे १ लाख लोकसंख्या आहे. या भागात अनेक चाळी, हॉटेल्स, दुकाने, शाळा, कार्यालये आहेत. मात्र, या वर्दळ असलेल्या परिसरासाठी उभारण्यात आलेली ४ क्रमांकाची बीट पोलिस चौकी नावापुरतीच उरली आहे. या चौकीपासून मुख्य पोलिस ठाणे ४ किमी अंतरावर आहे. मागील दोन वर्षापासून ही चौकी एकदाही उघडण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकीत पोलिस तैनात केलेले नाहीत. ही चौकी केवळ शोभेसाठीच उभारण्यात आली आहे का, असा प्रश्न ‘प्रहार’चे अंधेरी येथील वाचक सदानंद साटम यांनी या छायाचित्रातून उपस्थित केला आहे.