पुण्याच्या सौम्या स्वामिनाथनने ४०व्या राष्ट्रीय महिला चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
थ्रिसुर (केरळ)- पुण्याच्या सौम्या स्वामिनाथनने ४०व्या राष्ट्रीय महिला चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जेतेपद पटकावण्यासाठी सौम्याला ११व्या आणि शेवटच्या फेरीत विजयाची आवश्यकता होती. शनिवारी ११व्या फेरीत ३३व्या चालींमध्ये बाजी मारत सर्वाधिक नऊ गुण मिळवत सौम्याने बाजी मारली.
अव्वल सीडेड पद्मिनी राऊतला मागे टाकत दुस-या सीडेड सौम्याने शुक्रवारी अव्वल स्थानी झेप घेतली. त्यानंतर अव्वल स्थान कायम राखले. या जेतेपदानंतर सौम्याने आनंद व्यक्त केला. ‘‘ही स्पर्धा माझ्यासाठी खूप यशस्वी ठरली. शेवटच्या तीन विजयांनी माझी जेतेपदाची शक्यता वाढली,’’असे तिने म्हटले.
सौम्याने स्पर्धेतील ११ फे-यांमध्ये सर्वाधिक ११ विजय मिळवले. तसेच दोन सामने बरोबरीत सोडवले. केवळ दोन सामन्यांत सौम्याला पराभूत व्हावे लागले.