बेळ्गाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झा
बेळगाव – बेळ्गाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी कर्नाटक सरकारने आपले म्हणने मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यावर महाराष्ट्र सरकारतर्फे खटल्याला उपस्थित असलेले वकील के. हरीश, साळवे पाराशारण, राजीव रामचंद्रन, अॅड. विनोद बोबडे, अॅड अपराजिता सिंह, प्रदीप रंजन तिवारी आणि अन्य वकिलांनी त्यावर हरकत घेतली. त्यांनी कर्नाटक सरकारवर वेळकाढूपणा केल्याचा आरोप केला. त्यावर न्यायालयाने १ ऑक्टोबर ही तारीख पुढील सुनावणीसाठी जाहीर केली.
अॅड. माधव चव्हाण यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे १ आक्टोबरपासून आता मुद्दे निश्चित होणार आहे. मग खटला सुरू राहील. बेळगावसह सीमा भागातील ८६५ गावांवर महाराष्ट्र सरकारने दावा केला आहे. त्या बाबत ठोस पुरावेही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत. १ ऑक्टोबरला मुद्दे निश्चित करण्यात येणार असून आता सीमाप्रश्नांच्या याचिकेला गती येणार आहे, असेही ते म्हणाले.