तालुक्यातील मौजे टेंभवली, जुनादुर्खी येथील खाडी किना-यालगतच्या भातशेतीत समुद्राचे खारे पाणी शिरल्याने साडेतीनशे एकर जमीन नापीक होण्याचा धोका वाढला आहे.
भिवंडी – तालुक्यातील मौजे टेंभवली, जुनादुर्खी येथील खाडी किना-यालगतच्या भातशेतीत समुद्राचे खारे पाणी शिरल्याने साडेतीनशे एकर जमीन नापीक होण्याचा धोका वाढला आहे.
या प्रकारामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. कळवा येथील खारभूमी विकास विभागाचे शेत जमिनीसाठी संरक्षक बांध तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे खारेपाणी शेतजमिनीत शिरले आहे.
टेंभवली, जुनादुर्खी गावामधून वाहणारी वारणा नदी खारागोरा येथून खाडीचे रूप धारण करते. यातन समुद्राच्या भरतीचे पाणी दूपर्यंत पोहोचत असल्याने क्षारयुक्त पाण्यामुळे भातशेती नापीक झाली आहे. भात पिकाची लागवड करूनही पीक येणार नाही.
सरकार वाढीसाठी नापीक जमीन सुधारण्याचे कार्यक्रम राबवले जातात. त्यासाठी मोठा खर्च केला जात आहे. मात्र खारभूमी विकास योजनेचे अधिका-यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी टेंभवली, जुनादुर्खी गावची सुमारे साडेतीनशे एकर शेतजमीन धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांना चिंता लागली आहे.